Headlines

तालुक्यातील निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांन बाबत मनसे कार्यकारी अभियंताना विचारणार जाब…

परशुराम उपरकर; अवैध धंद्यांना सत्तधारी लोकप्रतिनिधींचा पाठिंबा… सावंतवाडी ता.२६-:* तालुक्यातील अनेक गावातील रस्ते उखडून निघाले आहेत. याबाबत अनेक लोकांच्या तक्रारी आमच्याकडे आल्याने याबाबत मनसे आज कार्यकारी अभियंता यांना जाब विचारणार असल्याची माहिती मनसेचे माजी आमदार परशुराम उपरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान कार्यकारी अभियंता हे सांगतात की, माझ्या मर्जीतील नाही तर आपल्या वर्ग मित्रांना काम…

Read More

हरियाणा येथून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरला तिलारी घाटात अपघात…

धोकादायक उताराचा अंदाज न आल्याने अपघात; कठड्याला अडकल्याने मोठी दुर्घटना टळली… दोडामार्ग ता.२६-:* गोवा ते दोडामार्ग ते कोल्हापूर बेळगाव मार्गावर बुधवारी राञी हरियांना येथून माल भरून गोवा येथे जाणाऱ्या मालवाहु कंटेनर याला तिलारी घाटातील धोकादायक उतार याचा अंदाज नसल्याने घाटातील अपघात ग्रस्त ठिकाण असलेल्या जय पाॅईंट येथे हा कंन्टेनर कठडा याला धडकून दरीत कोसळता कोसळता…

Read More

मठ येथे मोटर सायकल व रिक्षा यांच्यामध्ये समोरासमोर अपघात

चौघे गंभीर जखमी : गाड्यांचेही नुकसान वेंगुर्ले ता.२६-:* वेंगुर्ला ते कुडाळ कडे जाणाऱ्या रोडवर मठ पेट्रोलपंप समोर बुधवारी २५ मे रोजी रात्री ११.१५ वाजण्याच्या सुमारास रिक्षा व मोटरसायकल यांच्यामध्ये समोरासमोर अपघात झाला. या अपघाता मध्ये चौघेजण गंभीर जखमी झाले आहेत. त्यातील मोटरसायकल स्वार व रिक्षामधील एक जण असे दोघांना अधिक उपचारासाठी गोवा बांबुळी येथे हलविण्यात…

Read More

परिवहन मंत्री अनिल परबांच्या घरावर ED ची धाड

मुंबई ता.२६-:* शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या वांद्र्यातील निवासस्थानी आज सकाळी साडेसहा वाजता ईडीने धाड टाकली आहे. प्राप्त झालेल्या माहितीनुसार परब यांच्याशी संबधीत मुंबई, पुणे आणि रत्नागिरीतील अशा एकूण सात ठिकाणी ईडीकडून धाडसत्र सुरू करण्यात आले आहे. ही कारवाई अनिल देशमुख यांनी केलेल्या मनी लाँड्रिंग प्रकरणी करण्यात आल्याचे प्राथमिक माहितीत समोर…

Read More

आंबोलीत शिव संपर्क अभियान अंतर्गत बैठक संपन्न…

आगामी निवडणुकीत भगवा फडकवा; निरीक्षक चौऊलकर यांचे प्रतिपादन… आंबोली,ता.२५ शिवसेनेच्या शिव संपर्क अभियान अंतर्गत आंबोलीत बैठक झाली यावेळी समस्या पदाधिकाऱ्यांनी जाणून घेतल्या.तसेच अगामी निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकवा यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे.पक्ष सर्वतोपरी प्रयत्न करेल तसेच पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडे अहवाल देण्यात येईल असे या ठिकाणी आलेल्या निरीक्षक तथा स्थानिक लोकाधिकार समिती,सदस्य,महाराष्ट्र राज्य,मुंबई…

Read More

तारकर्ली येथील तरुणाची गळफासाने आत्महत्या

मालवण ता.२५-:* मालवण तालुक्यातील तारकर्ली वरचीवाडी महापुरुष मंदिर नजीकच्या घरात यशवंत उर्फ मनोज बुधाजी लोणे (वय ३१) या तरुणाचा मृतदेह आज सकाळी घरातील हॉलमध्ये गळफास लावलेल्या स्थितीत आढळून आला याप्रकरणी मालवण पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, मनोज याने आजाराला कंटाळुन आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे…

Read More

आंबोलीतील “त्या” अपघातास पोलिस यंत्रणा जबाबदार…

आशिष सुभेदार; कर्तव्यात कसूर करणाऱ्या त्या अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करा सावंतवाडी ता.२५-:* आंबोली घाटात काल रात्रीच्या सुमारास घडलेल्या भीषण अपघातास पोलिस यंत्रणा जबाबदार असून, पोलिस यंत्रणेतील भ्रष्टाचाराने त्या युवकाचा नाहक बळी घेतला असून, पोलिस प्रशासनाने त्याची जबाबदारी स्वीकारत कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी त्या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची तात्काळ कारवाई करावी अन्यथा मनसे पोलिस विभागाच्या निषेधार्थ आंदोलनाचा पवित्रा घेईल…

Read More

अंमली पदार्थांविरोधात २७ रोजी बैठकीचे आयोजन

*⚡वेंगुर्ला ता.२५-:* सिधुदुर्ग जिल्ह्यासह वेंगुर्ला तालुक्यातही अंमली पदार्थांची तस्करी, वाहतुक आणि सेवन यात वाढ झालेली आहे. याकडे विशेष लक्ष घालून उपाययोजना केली नाही तर युवा पिढी भविष्यात बरबाद होऊ शकते. तरुण पिढीला व्यसनाच्या विळख्यातून वाचविण्यासाठी अंमली पदार्थांच्या विरोधात सर्वांनी पुढे येणे आवश्यक आहे. हा लढा सशक्त करण्यासाठी याला पाठबळाची गरज आहे, यासाठी २७ मे रोजी…

Read More

अनंत पिळणकर यांचा गोव्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भास्कर भूषण पुरस्काराने होणार सन्मान

कणकवली ता.२५-:* सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात गेली तीन दशके विविध पदांवर कार्यरत असलेले आणि सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष म्हणून अल्पावधीत जिल्ह्याच्या राजकारणात आपला वेगळा ठसा उमटविणारे अनंत पिळणकर यांना भास्कर भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. महाराष्ट्र जर्नालिस्ट फौंडेशन कडून दिल्या जाणाऱ्या या पुरस्काराने अनंत पिळणकर यांना शनिवारी गोवा येथे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद…

Read More

युवापिढीला व्यवसनांपासून दूर ठेवण्यासाठी प्रबोधनाची गरज

*⚡वेंगुर्ला ता.२४-:* समाजपरिवर्तनामध्ये युवापिढीचा सहभाग आवश्यक आहे. तरच विकासाचे स्वप्न साकार होऊ शकते. परंतु, आज युवापिढी काही प्रमाणात व्यसनाच्या दिशेने जाताना दिसत आहे, ते थांबविण्याकरीता युवापिढीमध्ये याविषयी प्रबोधन होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन सिधुदुर्ग जिल्हा युथ संस्थेचे जिल्हाध्यक्ष डॉ.श्रीनिवास गावडे यांनी केले. युवापिढी अंमली पदार्थ सेवन करीत असल्याचे वृत्त समोर येत आहे, अशावेळी पालकांनी जागृत राहण्याची…

Read More
You cannot copy content of this page