एसटीची प्रवासी संख्या कमालीची घटल्याने मिनी बसेस आणाव्यात
बीओटी नकोच ..कुरिअर सेवा त्वरित सुरू करावी:भाई चव्हाण ⚡कणकवली ता.१०-: एकेकाळी प्रवासी सेवेत एसटीची मक्तेदारी होती. राज्यात प्रवाश्यांची दैनंदिन संख्या एक कोटीच्या वर होती. आता ती २५ लाखाच्या आसपास आली आहे. या परिस्थितीत आता रा. प. महामंडळाने मोठ्या गाड्यांचे पांढरे हत्ती पोसणे बंद करावेत. त्याऐवजी गोवा आदीं राज्यांप्रमाणे “मिनी बसेस” रस्त्यावर आणाव्यात, बीओटी ऐवजी रा….
