मेळाव्यातून विवाह गाठ बांधली जावी – एस.आर.डौर
⚡वेंगुर्ला ता.०२-: वधूवर सुचक मेळावा हा स्तुस्त्य उपक्रम आहे. लाभार्थ्यांनी आपला जोडीदार निवडताना दोन पाऊले मागे व दोन पाऊले पुढे येऊन निर्णय घेतला तर वधूवर मेळाव्याची खरी फलश्रुती होईल. या मेळाव्यातून जिल्ह्यातील युवक युवतींची विवाह गाठ बांधली जावी अशी अपेक्षा नागरी हक्क संरक्षण विभाग सिधुदुर्गचे सहाय्यक पोलिस निरीक्षक एस.आर.डौर यांनी कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त केली.
