आनंदयात्री वाङ्मय मंडळ, वेंगुर्ला च्या वतीने ‘बालकुमार साहित्य संमेलना’चे आयोजन…
⚡वेंगुर्ल ता.०९-: निसर्गसंपन्न अशा वेंगुर्ला तालुक्याला समृद्ध असा साहित्यिक वारसा लाभलेला आहे. हा तेजस्वी वारसा उगवत्या पिढीच्या उमलत्या बुद्धीला समजावून दिला पाहिजे. साहित्यातील विविध भावभावनांच्या परिपोषातून व वैचारिक वाङ्ममयाच्या विचारधारेतून मुलांच्या मनःपिंडाचे पोषण होत असते. त्यासाठी विद्यार्थ्याना साहित्याची आवड निर्माण व्हावी, ललित साहित्याविषयीची अभिरूची निर्माण व्हावी, मुलानी अवांतर वाचन करावे, नामवंत साहित्यिकांशी मुलांची भेट घडवून…
