मालवण येथील शासकीय विश्रामगृहाला देखील गळती…

सार्वजनिक बांधकाम मंत्री अधिकारी आणि ठेकेदारावर काय कारवाई करणार?:आमदार वैभव नाईक यांचा सवाल.. ⚡मालवण ता.०८-: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कणकवली येथील नुतन विश्राम गृहाला गळती लागली असून याचा पोलखोल आमदार वैभव नाईक यांनी केला. दरम्यान मालवण मेढा येथील सा. बा. विभागाच्या सिंधुरत्न (आरसे महाल) विश्रामगृहाची माहिती घेतली असता या विश्राम गृहाला देखील गळती लागल्याचे निदर्शनास आले….

Read More

काळसे बागवाडीला पुराच्या पाण्याचा वेढा…

शेतीचे मोठे नुकसान:प्रशासनाकडून मदतकार्य सूरू.. ⚡मालवण ता.०८-: गेले दोन दिवस संततधार कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे कर्लीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाल्याने सोमवारी पहाटे मालवण तालुक्यातील काळसे बागवाडीला पुराच्या पाण्याने वेढा दिला. काही घरांना पाण्याने वेढा दिल्याने बागवाडी ग्रामस्थांची तारांबळ उडून शेतकरी व ग्रामस्थांनी आपली गुरे, ट्रॅक्टर, शेती अवजारे व अन्य वाहने सुरक्षित स्थळी हलवली. मात्र पुरसदृश्य…

Read More

शहराला पाणीपुरवठा करणारे पाळणेकोंड धरण ‘ओव्हर फ्लो’…

सावंतवाडी : सावंतवाडी शहराला पाणीपुरवठा करणारे पाळणेकोंड धरण ‘ओव्हर फ्लो’ झाले आहे. गेले दोन दिवस सतत कोसळणाऱ्या पावसामुळे धरण पुर्ण क्षमतेने भरले आहे. दुपारीतीन वाजून १७ मिनिटांनी धरणाचा पहिला हायड्रोलिक दरवाजा उघडण्यात आला. या दरवाजातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला. याबाबतची माहिती माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी दिली आहे.

Read More

मुंबई-गोवा महामार्गाचे पावसात बारा वाजले…

इर्शाद शेख:पावसाने सार्वजनिक बांधकाम विभागाचे अक्षरशः थोबाड फोडले.. ⚡कुडाळ ता.०८-: मुंबई-गोवा महामार्गाचे गेली १३ वर्षे काम सुरू आहे. बांधकाम विभागाच्या म्हणण्यानुसार, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महामार्गाचे काम पूर्ण झाले आहे. हजारो कोटी रूपयांचा खर्च या महामार्गावर करण्यात आला आहे. दरवर्षीच सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टी होत असते त्यामुळे यावर्षीच जास्त पाऊस पडला असे म्हणता येणार नाही. जर दरवर्षीच अशा…

Read More

चाफेलीत कॉजवे गेला वाहून…

ऐन पावसाळ्यात ग्रामस्थ अडचणीत:काम निकृष्ट असल्याचा होतोय आरोप.. ⚡कुडाळ ता.०८-: तालुक्यात माणगांव खोर्‍यातील चाफेली काजरगोठणवाडी मुख्य रस्त्यावरील कॉजवेचा एक भाग निकृष्ठ कामामुळे रविवारी झालेल्या पुराच्या पाण्यात वाहुन गेला. त्यामुळे येथील ग्रामस्थांची मोठी गैरसोय झाली आहे. ऐन पावसाळी मौसमात कॉजवे वाहून गेल्याने आता करायचे काय? असा प्रश्न येथील नागरीकांना पडला आहे. गेले दोन दिवस माणगाव खोर्‍यातील…

Read More

देवगडात वादळी वाऱ्यामुळे सुमारे सुमारे १४ लाखांचे नुकसान…

सर्वाधिक १९८ मिमी पाऊस:शिरगाव, दाभोळे ,खाकशी, जामसंडे ,किंजवडे येथे मोठे नुकसान.. देवगड(प्रतिनिधी) देवगड तालुक्यात रविवारी सायंकाळी सोमवारी दुपारपर्यंत वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार अतिवृष्टीनेहाहाकार माजविला.तालुक्यातील नदि नाले दुथडी भरून वाहत होते बऱ्याच ठिकाणी सकल भागातील कॉजवे पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली होती. तर वाडा चांभारभाटी पुलानजीक पाणी आल्याने पडेल देवगडची वाहतुक बंद होती.देवगड नांदगाव मुख्य रस्त्यावर…

Read More

अतिवृष्टीतील आपत्तीग्रस्त नागरिकांना आमदार वैभव नाईक यांच्यावतीने मदतकार्य…

⚡कुडाळ ता.०८-:सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शनिवारी आणि रविवारी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली. त्यामध्ये ठीकठिकाणी पुरस्थिती उद्भवून नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरले. त्यामुळे लोकांची जेवण व राहण्याची मोठी गैरसोय निर्माण झाली. यावेळी आमदार वैभव नाईक यांनी पाहणी केली. पावशी शेलटेवाडी येथील ग्रामस्थांची तत्काळ जेवणाची सोय करण्यास सांगितले. आमदार वैभव नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली जेवणाचे वाटप पावशी माजी सरपंच बाळा कोरगावकर,…

Read More

विविध मागण्यांसाठी शिक्षक समिती आक्रमक…

शिक्षण विभागाच्या विरोधात केले आंदोलन: शिक्षण मंत्र्यांना आपला विभागच कळला नसल्यानेच जिल्ह्यातील शिक्षक डीएड बेरोजगार यांच्यावर अन्याय झाला;राजन तेली.. सिंधुदुर्गनगरी ता ८-:१५ मार्च २०२४ चा अन्यायकारक संच मान्यता आदेश तात्काळ रद्द करावा. जिल्हा परिषद शिक्षण विभागाने शिक्षक बदल्यांसाठी २१ मे रोजी राबविलेल्या समुपदेशन प्रक्रियेत बदल्या झालेल्या शिक्षकांना तात्काळ बदली आदेश द्या. पदवीधर ,केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी…

Read More

विविध मागण्यांसाठी शिक्षक संघाचे आंदोलन…

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मांडला ठिय्या.. सिंधुदुर्गनगरी -ता ८सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाने समुपदेशन पद्धतीने बदली प्रक्रिया राबवूनही अद्याप आदेश दिले नाहीत. आंतर जिल्हा बदली प्राप्त शिक्षकांनाही अद्याप कार्य मुक्त केले नाही. वेळोवेळी लक्ष वेधूनही शिक्षकांच्या प्रश्नाकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे. या अन्याया विरोधात दाद मागण्यासाठी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ सिंधुदुर्गच्या वतीने जिल्हा परिषद समोर आज धरणे आंदोलन…

Read More

मालवणात १७ ऑगस्ट रोजी ‘बरसती रंगसरी’ कार्यक्रम…

⚡मालवण ता.०८-:अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मालवण शाखेतर्फे दि. १७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता येथील मामा वरेरकर नाट्यगृह येथे ‘बरसती रंगसरी’ या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. ‘जुनं मालवण ते आताचं मालवण’ हा प्रवास विनोदी पद्धतीने गीत, नृत्यांसह या कार्यक्रमात साकारण्याचा प्रयत्न होणार आहे. तरी सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Read More
You cannot copy content of this page