Global Maharashtra Breaking News

परुळे जी प मतदार संघाचा शिवसंपर्क अभियानाचा शुभारंभ

पालकमंत्री उदय सामंत यांची उपस्थिती *💫वेंगुर्ला दि.१५-:* वेंगुर्ले तालुक्यातील म्हापण जिल्हा परिषद मतदारसंघात परूळे येथे शिवसंपर्क अभियान शुभारंभ पालकमंत्री श्री उदयजी सामंत यांच्या अध्यक्षतेखाली माजी राज्यमंत्री आम आमदार श्री दिपक केसरकर,युवानेते श्री संदेश पारकर जिल्हाप्रमुख श्री संजय पडते यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी पालकमंत्रीउदय सामंत,आमदार दिपक केसरकर,यांनी उपस्थित पदाधिकारी शिवसैनिक यांना मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी…

Read More

चांदा-बांदा योजना चांगली होती

आम. केसरकर यांना पालकमंत्री म्हणून राबविता आली नाही;उपरकर यांचा आरोप *💫सावंतवाडी दि.१५-:* आमदार दिपक केसरकर यांनी पालकमंत्री असताना चांदा ते बांदा योजना ही चांगली आणली परंतु त्यांना नीट राबवता आली नसल्याने ही योजना बंद झाल्याची टिका परशुराम उपरलकर यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले केली आहे.

Read More

११ रक्तदात्यांनी केले रक्तदान

भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे स्थापना सुवर्ण महोत्सवी आयोजन *💫सिंधुदुर्गनगरी दि.१५-:* भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा यांच्या स्थापनेला १६ जुलै रोजी ५० वर्षे पूर्ण होत असल्याने या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित आजच्या रक्तदान शिबिरात एकूण ११ रक्तदात्यांनी रक्तदान केले. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या स्थापनेला १६ जुलै रोजी ५० वर्षे पूर्ण होत आहेत. या सुवर्ण…

Read More

दारिद्र्य रेषेखालील यादीची पु:नरचना अत्यावश्यक;

भाई चव्हाण 70 कोटी जनतेला मोफत धान्य? कनिष्ठ मध्यमवर्गींयांची होरपळ *💫कणकवली दि.१५-:* पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच कोरोना महामारीमुळे देशातील ७० कोटी जनतेला नोव्हेंबरपर्यंत मोफत धान्याची घोषणा केली. मात्र पैकी किती टक्के जनतेला मोफत धान्य मिळते हा संशोधनाचा विषय आहे. केसरी कार्डधारकांवर लादण्यात आलेल्या अटी-शर्ती मुळे यातील ५ टक्के जनतेला सुद्धा विकत धान्य मिळत नाही….

Read More

सत्तेत असताना एकत्र आणि वेगळे झाल्यावर आरोप-प्रत्यारोप

जनतेने आता याना ओळखावे:परशुराम उपरकर यांचा सेना-भाजपला टोला *💫सावंतवाडी दि.१५-:* शिवसेना-भाजप मध्ये शहरात अपहार झाल्याचे आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. परंतु यापूर्वी शिवसेना भाजप एकत्र सत्तेत होते.तेव्हा दिप क केसरकर पालंकमंत्री होते आणी आता हे वेगवेगळे झाल्याने आता एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू केले आहेत. मात्र जनतेने आता ओळख पाहिजे या लोकप्रतिनिधी व ठेकेदाराने जनतेचा विकास न करता…

Read More

जिल्ह्यात आज आणखी १५० व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह

*💫सिंधुदुर्गनगरी दि.१५-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण ४१ हजार २७२ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ३,हजार १२१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी १५० व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

Read More

गाभण म्हैशीचा जंगली प्राण्याकडून पाडला फडशा

असनिये जंगलातील प्रकार;बिबटया की पटेरी वाघ ? याबाबत आहेत मतांतरे *💫सावंतवाडी दि.१५-:* असनिये येथील जंगल परिसरात चरत असलेल्या एका गाभण म्हैशीवर बुधवारी वाघाने हल्ला करीत तिचा फडशा पाडला. ग्रामस्थांनी बिबट्या नसून तो पट्टेरी वाघच असल्याचे सांगितले. मात्र तो पट्टेरी वाघ आहे की बिबट्या याबाबत सांशकता व्यक्त होत आहे. असनिये गावठणवाडी येथील विश्वनाथ गोपाळ सावंत यांची…

Read More

उद्याच लागणार दहावीचा निकाल,

शिक्षणमंत्र्यांनी दिली माहिती *💫मुंबई दि.१५-:* महाराष्ट्रातील दहावीच्या बोर्ड परीक्षांच्या निकालाची प्रतीक्षा अखेर संपली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सन २०२१ मध्ये अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आलेला इ.१०वीचा ऑनलाईन निकाल शुक्रवारी दि.१६ जुलै,२०२१ रोजी दुपारी एक वाजता जाहीर होणार आहे. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाने ही माहिती दिली.

Read More

शिक्षक समितीने घेतली मंत्री मुश्रिफ, जयंत पाटील यांची भेट

शिक्षकांच्या विविध समस्यांचे दिले निवेदन *💫ओरोस दि.१५-:* बुधवार महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या शिष्टमंडळाने मंञालय मुंबई येथे राज्याचे जलसंपदामंत्री जयंतराव पाटील व राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत चर्चा करून निवेदन दिले . जलसंपदामंत्री जयंत पाटील यांचेशी झालेल्या चर्चेत ७ वा वेतन आयोग खंड १ व खंड २ मधील ञुटीबाबत,आंतरजिल्हा…

Read More

शिवसैनिकांनी एकत्रित रित्या काम करून संघटना वाढीसाठी मेहनत घ्यावी – आ. वैभव नाईक

*💫कुडाळ दि.१५-:* राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचे कोकणावर विशेष प्रेम आहे. त्यामुळे आपल्या जिल्ह्यासाठी त्यांनी शासकीय मेडिकल कॉलेज मंजूर केले. कुडाळ महिला बाल रुग्णालय कोरोना रुग्णांच्या सेवेत कार्यरत आहे. तौक्ते वादळात झालेल्या नुकसानीवेळी त्यांनी पूर्ण ताकद लावून परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी शासकीय पातळीवर बळ दिले. नुकसान भरपाई मिळवून देऊन लोकांना दिलासा दिला.लोकांच्या अडचणीच्या वेळी आपण त्यांना…

Read More
You cannot copy content of this page