Global Maharashtra Breaking News

हवामानातील बदलामुळे आंबा काजू बागायतदार मेटाकुटीस…

राज्य शासनाने शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे; तुळस येथील बागायतदार शेतकऱ्यांची निवेदनाद्वारे मागणी वेंगुर्ला प्रतिनिधी-वेळोवेळी बदलत्या हवामानामुळे व अवकाळी पावसामुळे आंबा – काजू बागायतदार मेटाकुटीस आलेला आहे. शेतक-यांना आत्महत्येशिवाय पर्याय उरलेला नाही. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व महाविकास आघाडी सरकार यांनी या सर्व गोष्टींचा गांभीर्याने विचार करून शेतक-यांना कर्जमुक्त करावे,अशी मागणी वेंगुर्ला तालुक्यातील तुळस येथील आंबा-काजू बागायतदार शेतकरी…

Read More

वेंगुर्ले-पॉस मशिनवर सरव्हर डाऊनमुळे थम लागत नसल्याने धान्यदुकानदारांवर ग्राहकांचा राग

शासनाने ही समस्या दूर करावी- रुपेश पेडणेकर वेंगुर्ले ता.२८-:* गेल्या दोन महिन्यांपासून इंटरनेटचे सरव्हर वारंवार खंडीत होत असल्याने रेशनधान्य ग्राहकांना शासनाकडून पुरविण्यांत येणार धान्य वितरण करता येत नसल्याने सिंधुदुर्ग जिल्हयातील रेशनधान्य दुकानांवर ग्राहकांच्या रांगा लागतात. पण त्यांना धान्य मिळू शकत नाही. मात्र याचा उलट परीणाम शासनाचे काम प्रामाणिकपणे पार पाडणाऱ्या रेशनधान्य दुकानधारांना ग्राहकांच्या असंतोषाला समोरे…

Read More

मुरबाड येथे पाच दिवशीय टुरिस्ट गाईड ट्रेनिंग

अनेक विदयार्थ्यांनी पर्यटनाविषयक घेतले प्रशिक्षण : पर्यटनाच्या माध्यमातून कोकणामध्ये विकास करण्याचे ध्येय देवगड ता.२८-:* पर्यटन संचलनालय कोकण‍ विभाग नवी मुंबई अयोजित पाच दिवशीय टुरिस्ट गाईड ट्रेनिंग मुरबाड येथे यशस्वीरित्या आयोजन करुन पार पाडण्यात आले. यावेळी अनेक विदयार्थ्यांनी पर्यटनाविषयक प्रशिक्षण घेतले आहे. पर्यटन एके पर्यटनाच्या माध्यमातून कोकणामध्ये विकास करण्याचे ध्येय पर्यटन संचालनालय कोकण विभागाने ठरविले असून…

Read More

तळ ठोकलात तरी भाजपचाच नगराध्यक्ष बसणार

आ केसरकर यांच्या वक्तव्यावर अमित परब यांचे उत्तर;कोरोना काळात कुठे होता ? असाही केला प्रश्न सावंतवाडी ता.२७-: कोरोना महामारी च्या काळात ज्या वेळी जनतेला खऱ्या अर्थाने आधाराची गरज होती त्यावेळी दीपक केसरकर कुठे लपून बसले होते असा सवाल चराठा ग्रामपंचायत सदस्य अमित परब यांनी दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेत केलेल्या विधानाला प्रतिउत्तर देते वेळी केला…

Read More

रवींद्र मडगांवकर यांना राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

जिल्हा परिषद-पंचायत समिती सदस्य असोसिएशनने घेतली दखल;५ मार्च रोजी वितरण सावंतवाडी ता.२७-:* जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य असोसिएशनच्या वतीने देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय पुरस्कार मार्च २०२२साठी रविंद्र मनोहर मडगावकर यांची निवड करण्यात आली आहे. त्याबाबत चे पत्र त्यांना प्राप्त झाले असून पुणे येथील अण्णाभाऊ साठे सभागृह येथे 5 मार्च रोजी सायंकाळी 5 वा आयोजित पुरस्कार समारंभात…

Read More

रक्तदान अवयवदान जागृती पत्रलेखन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

मालवण ता.२७-:* रक्तदान अवयवदान देहदान व रुग्णमित्र म्हणून कार्य करणारी जिल्ह्यातील अग्रगण्य अशा ‘सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग’ या संस्थेमार्फत ‘रक्तदान अवयवदान जागृती’ करण्याकरिता घेण्यात आलेल्या पत्रलेखन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धेत विद्यार्थी व खुल्या गटातून एकूण ३६४ स्पर्धकांनी सहभाग घेऊन प्रत्यक्ष आंतरदेशीय पत्र लिहून स्पर्धा यशस्वी केली. सिंधुदुर्गसह महाराष्ट्रातही अशी अभिनव स्पर्धा घेणारी सिंधु…

Read More

मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलसाठी भटवाडी बाहेरचावाडा येथे जागा आरक्षित

निधी मिळण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे प्रस्ताव;अमित सामंत, प्रवीण भोसले, अर्चना घारे-परब यांचे प्रयत्न सुरू सावंतवाडी ता.२७-:सावंतवाडीच मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल जागेमुळे रखडलं आहे. यासाठी सावंतवाडी नगरषरिदेकडून भटवाडी – बाहेरचावाडा येथे जागा आरक्षित केलेली आहे. या जागेच्या मोबदल्यासाठी आवश्यक असणारा निधी मिळावा यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे सावंतवाडी राष्ट्रवादीकडून मागणी केलेली असून याबाबतचा प्रस्ताव…

Read More

वेंगुर्ले ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अतुल मुळे यांचे निधन…

वेंगुर्ले ता.२७-:* वेंगुर्ले येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अतुल मुळे (वय ५४) यांचे आज २७ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने सातारा येथे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. वेंगुर्ले ग्रामीण रुग्णालयात अनेक वर्ष ते वैद्यकीय अधिकारी म्हणून ते कार्यरत होते. गेले पाच सहा दिवसांपूर्वीच ते आपल्या…

Read More

कणकवलीची पत्रकारीता प्रगल्भ, वैचारिक

कणकवली तालुका पत्रकार समिती आयोजित पुरस्कार वितरण व स्नेहमेळावा प्रसंगी मान्यवरांचे कौतुकोद्गार कणकवली ता.२७-:* कणकवली तालुक्याची पत्रकारीता नेहमीच प्रगल्भ वैचारीक राहीली आहे. वाचकांचा विश्वास जपण्याचे काम कणकवली पत्रकार समितीने नेहमीच केले आहे. अन्यायग्रस्तांना न्याय देण्यासाठी ही समिती नेहमीच पुढे राहीली आहे. पत्रकार समितीने ही विश्वासाहर्तता यापुढेही कायम जपावी, अशा शब्दांमध्ये विविध मान्यवरांनी कौतुक केले. कणकवली…

Read More

मालवणी कवितांच्या सादरीकरणाने रसिक श्रोते मंत्रमुग्ध…

मालवण ता.२७-:* मराठी राज भाषा दिनानिमित्त मालवण येथील शिवाजी वाचन मंदिरतर्फे आयोजित मालवणी कविता सादरीकरण कार्यक्रमात मालवणी कवी दादा मडकईकर व रुजरिओ पिंटो यांनी विविध कविता सादर करत उपस्थित रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. मालवण येथील श्री शिवाजी वाचन मंदिर तर्फे मराठी राजभाषा दिनानिमित्त मालवण भरड येथील श्री दत्त मंदिरात मालवणी कविता सादरीकरण कार्यक्रम संपन्न झाला….

Read More
You cannot copy content of this page