तुळसमधील एकही शाळा शिक्षकाविना राहू नये
गटशिक्षणाधिका-यांचे वेधले लक्ष ⚡वेंगुर्ला ता.०७-: शिक्षकांच्या बदल्यांमुळे तुळस गावातील प्राथमिक शाळांमधील रिक्त झालेल्या पदांबाबत सामाजिक कार्यकर्त्या सुजाता पडवळ यांनी गटशिक्षणाधिकारी यांचे लक्ष वेधले आहेत. दरम्यान, तुळस गावातील एकही शाळा शिक्षकाविना राहणार नसल्याची विशेष दक्षता घेऊन आपले स्तरावर लवकरात लवकर कार्यवाही करण्याची मागणीही केली आहे. फोटोओळी – शिक्षक भरतीबाबत गटशिक्षणाधिका-यांना निवेदन देऊन त्यांचे लक्ष वेधले.
