Headlines

Global Maharashtra Breaking News

घोणसरी प्राथ.शाळेचे तेजस तेली,भाविका भरणकर यांची नवोदयसाठी निवड

⚡कणकवली ता.२७-: एप्रिल २३ मध्ये (इयत्ता पाचवी) घेण्यात आलेल्या परीक्षेतून, वाहर नवोदय विद्यालय सांगेली – सावंतवाडी साठी फोंडाघाट – घोणसरी प्राथ. शाळा नंबर ५ मधून, तेजस तेली आणि भाविका भरणकर या मुलांची निवड करण्यात आली. मुलांचे आयुष्य घडविण्यात या विद्यालयाचा नावलौकिक आहे. स्पर्धात्मक परीक्षेतून, गुणवत्तेच्या आधारावर, ग्रामीण भागातील वाडी वरच्या प्राथमिक शाळेतून, या दोन मुलांच्या…

Read More

डॉ हळदवणेकर यांचा सिंधुदुर्ग गौरव पुरस्काराने सन्मान

कराड येथील हुतात्मा अपंग बहुउद्देशीय विकास कल्याणकारी संस्थेने केला सत्कार सिंधुदूर्गनगरी ता २७हुतात्मा अपंग बहुउद्देशीय विकास कल्याणकारी संस्था, कराड यांच्यावतीने सोमवारी ओरोस रवळनाथ मंदिर येथे राजश्री शाहू महाराज जयंतीचे औचित्य साधून मुळदे उद्यानविद्या महाविद्यालय चे सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रदीप हळदवणेकर यांना“राज्यस्तरीय सिंधुदुर्ग गौरव पुरस्कार” ने सन्मानित करण्यात आले आहे. याबद्दल सर्व स्तरातून डॉ. हळदवणेकर यांचे…

Read More

सरकार आपल्या दाराशी, लाभार्थी झाले बांग्लादेशी…

ओरोस जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिवसेनेचे जमिनीवर बसून आंदोलन;राज्य सरकार आणि प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा केला निषेध.. ⚡ओरोस ता.२७-: शेकडो बांग्लादेशी नागरिकांना पी. एम. किसान योजनेचा लाभ मिळाला असून शासनाच्या पैशांचा अपव्यय झाला आहे. राज्य सरकार आणि प्रशासनाच्या या भोंगळ कारभाराचा निषेध व्यक्त करत कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संजय पडते, महिला जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत यांच्या नेतृत्वाखाली…

Read More

‘वंदे भारत’ पर्यटनाला गतिमान करणारी

सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण ⚡सिंधुदुर्गनगरी ता.२७-: महाराष्ट्र आणि गोव्यासाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. वंदे भारत रेल्वेच्या शुभारंभाचा हा ऐतिहासिक क्षण देशाच्या प्रगतीला पूरक ठरणारा व या दोन राज्यांच्या पर्यटनाला चालना देणारा ठरणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांचे हे स्वप्न पूर्ण केले केले आहे. पर्यटकांना चांगल्या सुविधा देणारी आणि पर्यटनाला गतिमान करणारी रेल्वेतील ही…

Read More

वेंगुर्ला ते कालवीबंदर पायीवारी २९ रोजी

⚡वेंगुर्ला ता.२७-: वै.श्रीकृष्ण ऊर्फ बाबू झांट्ये ह्यांच्या प्रेरणेने सुरू झालेली विठुरायाची पायीवारी सलग चौथ्या वर्षीही त्यांच्या मित्र परिवारांच्या सहकार्याने प्रति पंढरपूर असलेल्या केळूस-कालवीबंदर येथील विठ्ठल रखुमाई मंदिरात २९ जुन रोजी देवशयनी आषाढी एकादशीला जाणार आहे.

Read More

मल्टी स्किल डेव्हलपमेंट अंतर्गत दाभोली येथे तंत्र शिक्षण विभाग सुरू

⚡वेंगुर्ला ता.२७-: ‘हाताला काम श्रमाला दाम‘ या उक्तीप्रमाणे आजच्या युगात विद्यार्थ्यांच्या सर्वांगिया विकास होण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांमध्ये श्रमप्रतिष्ठा वाढीस लागावी. तंत्र शिक्षण हे गगना एवढं क्षेत्र आहे त्याची ओळख विद्यार्थी दशेपासून विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासक्रम सोबत व्हावी यासाठी दाभोली इंग्लिश स्कूल शाळा व्यवस्थापन समिती, पालक शिक्षक संघ, दाभोली इंग्लिश स्कूल माजी विद्यार्थी व ग्रामस्थ यांच्य वतीने कोझ…

Read More

सुरंगपाणी येथे आषाढी निमित्त विविध कार्यक्रम

⚡वेंगुर्ला ता.२७-: श्री विठ्ठल पंचायतन देवस्थान खानोली-सुरंगपाणी येथे गुरुवार दि. २९ जून रोजी आषाढी एकादशी निमित्त विविध कार्यक्रम संपन्न होणार आहेत. सकाळी ८ वा. श्रींची नित्यपूजा, सकाळी १० ते रात्रौ १२ वाजेपर्यंत विठ्ठलनामाचा गजर, दिवसभर विविध भजनांचे कार्यक्रम होणार आहेत. ज्या भजन मंडळांना याठिकाणी भजन सेवा करायची आहे त्यांनी मिलिद पंडित (९४०५४५६७१२) यांच्याशी संफ साधावा….

Read More

अखेर खचलेल्या संरक्षण भिंतीच्या ठिकाणी मातीचा भराव टाकला…

राष्ट्रवादीच्या इशाऱ्यानंतर बांधकामाला जाग.. सावंतवाडी ता.२७-:संरक्षण भिंतीच्या खचलेल्या ठिकाणी तात्काळ भराव टाका अन्यथा वृक्षारोपण करू असा इशारा काल राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी दिल्यानंतर आज त्या खचलेल्या भागात सकाळपासून माती भरण्याचं काम सुरू करण्यात आले असून त्यामुळे राष्ट्रवादीच्या प्रयत्नांना यश आल्याची माहिती दळवी यांनी यावेळी दिली

Read More

छत्रपती शाहू महाराजांचा वारसा जपण्यासाठी लोकशाहीला महत्त्व द्या…

अनिल शिर्के ; गुप्ते वाळके महाविद्यालयात छत्रपती शाहू महाराज जयंती ⚡बांदा ता.२७-: शिक्षण हा समाज परिवर्तनाचा महत्त्वपूर्ण घटक आहे. शिक्षणापासून सामाजिक उन्नती साधता येते. हे ओळखून छत्रपती राजश्री शाहू महाराजांनी तत्कालीन कालखंडात गोरगरीब जनतेच्या शिक्षणाला महत्त्व दिले. आजच्या कालखंडात हा वारसा जपायचा असेल तर लोकशाहीचे महत्त्व जाणले पाहिजे. सामाजिक न्याय व सामाजिक समतोल राखण्याचे आव्हान…

Read More

आंबोली आरोग्य केंद्रात औषध गोळ्यांचा पुरवठा तात्काळ करा…

अनिल चव्हाण यांची आरोग्य प्रशासनाकडे मागणी ⚡आंबोली,ता.२७-: येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात औषध गोळ्यांचा पुरवठा जिल्हा आरोग्य प्रशासनाने तात्काळ करावा. अशी मागणी येथील ग्रामस्थांतर्फे अनिल चव्हाण यांनी केली आहे. येथील भौगोलिक परिस्थिती,थंड हवेचे ठिकाण,सावंतवाडी पासून 30 किलोमीटर अंतर आणि राज्यातील सर्वाधिक पावसाचे अतिपावसाचे ठिकाण,वर्षा पर्यटनासाठी येणारे लाखो पर्यटक ,घाटात गाड्यांचे अपघात यासर्व बाबीचा विचार करून आंबोली…

Read More
You cannot copy content of this page