Global Maharashtra Breaking News

राणेवाडी येथील वस्तीत जाण्यासाठी नदीपात्रात पूल बांधण्याचे काम मंजूर…

हेमंत मराठे व राणेवाडी ग्रामस्थ यांच्या मागणीला यश: पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह संदीप गावडे यांचे मानले आभार.. सावंतवाडी – ग्रामपंचायत मळेवाड कोंडूरे कार्यक्षेत्रात असलेल्या राणेवाडी मध्ये जाण्यासाठी नदीपात्रात कमी उंचीचा कॉजवे असल्याने पावसाळ्यात पूरस्थितीमध्ये पाच पाच सहा सहा दिवस राणेवाडी कॉजवेवर पुराचे पाणी असते.यामुळे या वाडीचा गावापासूनचा संपर्क तुटतो.या नदीपात्रात जास्त उंचीचा पूल बांधावा अशी…

Read More

अलाईव्ह स्टॅच्यू ग्रुपला राज्यस्तरीय कला गौरव पुरस्कार जाहीर…

बांदा/प्रतिनिधीमानवी जिवंत पुतळ्याची (स्टॅच्यू) कला सादरीकरण करून त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून गरजू विद्यार्थी व समाजातील गरजवंत व्यक्तींना मदत करून सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी कार्यरत असलेल्या येथील अलाईव्ह स्टॅच्यू ग्रुपला राज्यस्तरीय कला गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. मुंबईतील सोहळ्यात लवकरच या पुरस्काराचे वितरण मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. अलाईव्ह ग्रुप मधील मनोज सुरेश कल्याणकर, विश्वास तुकाराम सावंत व उर्वेश…

Read More

अन्नपूर्णा नदीवरील दहिबाव कोटकामते पुलाला मंजुरी;…

अर्थसंकल्पात ५ कोटी २५ लाखाच्या निधीची तरतूद ;पालकमंत्री रवींद्र चव्हाण व आमदार नितेश राणे यांचे विशेष प्रयत्न.. देवगड (प्रतिनिधी)१० जुलै २०२४ देवगड तालुक्यातील दहिबाव कोटकामते या गावांना जोडणारा अन्नपूर्णा नदीवरील पूलाला अखेर चालू अर्थसंकल्पात मंजुरी मिळाली आहे.५ कोटी २५ लाखाच्या भरीव निधी या पुलासाठी मंजूर करण्यात आला आहे. यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा बांधकाम मंत्री रवींद्र…

Read More

जिल्ह्यात स्वच्छतेचे रंग दोन ओला हिरवा व सुका निळा अभियानाला सुरुवात…

मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख यांची माहिती.. ओरोस ता १०स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा-2 अंतर्गत महाराष्ट्र राज्य डिसेंबर 2024 पर्यंत हागणदारीमुक्त अधिक मॉडेल करावयाचे आहे. त्यासाठी मॉडेल झालेल्या गावात दृष्यमान शाश्वत स्वच्छता ठेवणे आणि हागणदारीमुक्त अधिक झालेली गावे मॉडेल करणे या विविध विषयाच्या अनुषंगाने 8 जुलै ते 7 ऑगस्ट 2024 या कालावधीत गृहभेटीच्या माध्यमातून जनजागृती…

Read More

जिल्ह्यात स्टॉप डायरिया अभियानाला प्रारंभ…

सहकार्य करण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी देशमुख यांचे आवाहन. ओरोस ता १०जलजन्य आजार रोखण्याबाबत लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या वतीने 1 जुलै 2024 ते 31 ऑगस्ट 2024 या कालवधीत स्टॉप डायरिया अभियान राबविण्यात येत असून जिल्ह्यातील प्रत्येक गावात हे अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानात जिल्हावासियांनी सहभाग घ्यावा असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी…

Read More

शिक्षक समितीचे जिल्हा परिषद समोर साखळी उपोषण सुरू…

सिंधुदुर्गनगरी ता १०गणित, विज्ञान पदवीधर शिक्षकांना वेतनश्रेणी न दिल्याने महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने जिल्हा परिषद समोर साखळी उपोषण सुरु केले आहे.जि.प.सिंधुदुर्ग येथे २०१९ मध्ये पवित्र पोर्टल मार्फत ७६ गणित/विज्ञान पदवीधर शिक्षकांना नियुक्ती देण्यात आलेली होती. त्यापैकी ७३ पदवीधर शिक्षकांनी ३ वर्ष समाधानकारकरित्या शिक्षण सेवक कालावधी पूर्ण केल्यानंतर या शिक्षकांचे नियमित आदेश निर्गमित करतांना…

Read More

जिल्ह्यातील 33 गावे जोखीमग्रस्त म्हणून निश्चित…

देतो स्पायरोसिस व जलजन्य साथीच्या कारणामुळे खबरदारी.. सिंधुदुर्गनगरी ता १०लेप्टो स्पयरोसिस व जलजन्य साथीचे आजार या कारणामुळे सिंधुदूर्ग जिल्ह्यातील ३३ गावे जोखिमग्रस्त म्हणून निश्चित करण्यात आली आहेत. या गावांमध्ये आरोग्य विभागाचा विशेष लक्ष असणार आहे. अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सई धुरी यांनी दिली. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सई धुरी यांच्या दालनात पत्रकार परिषदेचे…

Read More

जिल्ह्याची लोकसंख्या नियंत्रणात…

लोकसंख्या दिनानिमित्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर यांची माहिती.. सिंधुदुर्गनगरी ता १०सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुटुंब नियोजन कार्यक्रम प्रभाविपणे राबविण्यात येत असल्याने जिल्ह्याची लोकसंख्या नियंत्रणात आहे. सिंधुदुर्ग हा सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा असून लोकसंख्या वाढीचा दर निगेटिव्ह आहे. जिल्ह्याचे निव्वळ जन्म प्रमाण ७.७३ एवढे आहे. लोकसंख्या नियंत्रणासाठी आवश्यक असलेल्या सर्व उपाययोजना जिल्ह्यात प्रभावीपणे राबविल्या जात असल्याने जिल्ह्याची लोकसंख्या…

Read More

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी जास्तीत जास्त महिलांनी अर्ज करावेत…

जिल्हाधिकारी किशोर तावडे यांचे आवाहन.. ओरोस ता १०मुख्यमंत्री – माझी लाडकी बहिण योजनेसाठी जिल्ह्यात तीन लाख ३६ हजार महिला आहेत. यातील २३ हजार ८८७ महिलांनी अर्ज दाखल केले आहेत. या योजनेत एकाच घरातील अनेक महिला व केवळ एकच अविवाहित महिला लाभ घेवू शकते, असे सांगत जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांनी जास्तीत जास्त संख्येने अर्ज दाखल करावेत, असे…

Read More

बांदा शहरातील व्यापाऱ्यांचे झालेल्या नुकसानाचीमहसूल व कृषी विभागाने तात्काळ पंचनामे करावे…

साई काणेकर:स्थानिकांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी मंत्री दीपक केसरकर यांच देखील लक्ष वेधणार.. ⚡बांदा ता.१०-: रविवारी तेरेखोल नदीला आलेल्या महापुरात बांदा शहरातील व्यापाऱ्यांची दुकाने व अनेक घरांमध्ये पुराचे पाणी शिरून नुकसान झाले. तसेच परिसरातील ग्रामीण भागातील शेतीचे देखील अतोनात नुकसान झाले. महसूल व कृषी विभागाने तात्काळ पंचनामे पूर्ण करून नुकसानग्रस्तांची यादी बनवावी अशी मागणी शिवसेना…

Read More
You cannot copy content of this page