Headlines

गणेश फणसेकर यांचे निधन…!

⚡मालवण ता.०८-:मालवण देऊळवाडा येथील रहिवासी गणेश उर्फ आपा काशिनाथ फणसेकर (६५) यांचे शनिवारी पहाटे २.३० वाजता निधन झाले. त्यांच्या पश्चात भाऊ, बहिण, वहिनी, पुतण्या असा परिवार आहे. त्यांच्यावर देऊळवाडा येथील स्मशानभूमीत सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.

Read More

वाहतूक पोलीस हेड कॉस्टेबल सुनिल वेंगुर्लेकर यांचा नवीमुंबई येथे सत्कार…

⚡सावंतवाडी ता.०८-: महामार्ग पोलीस मदत केंद्र कसाल, यांच्या मार्गदर्शनाखाली कणकवली नेमणूकीतील पोलीस हेड कॉस्टेबल श्री. सुनिल दत्ताराम वेंगुर्लेकर यांनी३६ व्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान २०२५ अंतर्गत केलेल्या कारवाई बद्दल सन्मानचिन्ह व प्रशस्तीप्रत्रक देवून त्यांचा महामार्ग पोलीस मदत केंद्र, पळस्पे, नवीमुंबई येथे सत्कार करण्यात आला.त्यांच्या सर्वोत्कृष्ट कामगिरीकरीता महाराष्ट्र राज्य पोलीस वाहतूक विभागाचे प्रमुख अपर पोलीस महासंचालक…

Read More

जिल्ह्यातील विकासकामे गुणवत्तेसह वेळेत पूर्ण करा…

पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश:विविध विभागांचा घेतला आढावा.. ⚡कणकवली ता.०८-: जिल्ह्याच्या विकासासाठी मुबलक प्रमाणात निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. जिल्ह्यातील विकासकामे व प्रकल्पांची कालबध्द नियोजनातून अंमलबजावणी करावी. ही कामे गुणवत्तेसह वेळेत पूर्ण करण्याची जबाबदारी संबंधित यंत्रणाची असल्याने सर्वांनी जबाबदारीणे काम करण्याचे निर्देश पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले. कणकवली येथे विविध जिल्हास्तरीय यंत्रणांची आढावा बैठक पालकमंत्री…

Read More

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस शिवसेनेच्यावतीने महसूल पंधरवडा म्हणून साजरा करणार…

माजी मंत्री दीपक केसरकर:तर संपूर्ण मतदारसंघासाठी एक भव्य क्रिकेट स्पर्धा आयोजित करणार.. ⚡सावंतवाडी ता.०८-: महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस शिवसेनेच्यावतीने महसूल पंधरवडा म्हणून साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तर येत्या पंधरा दिवसांत उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व…

Read More

श्री स्वराज्य प्रतिष्ठान बांदा तर्फे बांद्यात चित्रकला व रंगभरण स्पर्धा…

बांदा/प्रतिनिधीशिवजयंतीचे औचित्य साधून दरवर्षी प्रमाणे श्री स्वराज्य प्रतिष्ठान बांदा तर्फे मुलांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी जिल्हास्तरीय रंगभरण व चित्रकला स्पर्धेचे आयोजन रविवार दिनांक ९ फेब्रुवारी रोजी करण्यात आले आहे. ही स्पर्धा आळवाडा येथील अटलबिहारी वाजपेयी उद्यानात निसर्गाच्या सानिध्यात संपन्न. होणार आहे.ही स्पर्धा एकूण ४ गटात होणार आहे, यात अंगणवाडी ते पहिली गटासाठी रंगभरण स्पर्धा आणि दुसरी…

Read More

रेशनकार्ड मध्ये नोंदणी केलेल्या सर्व सदस्यांचे ई-केवायसी १५ फेब्रुवारी पर्यंत पूर्ण करा…

बाळु सावंत यांचे आवाहन:अन्यथा अन्नधान्याचा लाभ बंद होणार.. ⚡बांदा ता.०८-: राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब योजने अंतर्गत शिधापत्रिका धारकांना शासकीय अनुदानित धान्याचा लाभ सुरु ठेवण्यासाठी कुटुंबातील रेशनकार्ड मध्ये नोंदणी केलेल्या सर्व सदस्यांचे ई-केवायसी १५ फेब्रुवारी पर्यंत पूर्ण करावे अन्यथा त्यांना अन्नधान्याचा लाभ बंद होणार आहे. त्यासाठी लवकरात लवकर ई केवायसी…

Read More

दिल्लीतील निर्विवाद यशाचा जिल्ह्यात भाजपकडून जल्लोष…

सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा कार्यालयात पेढे भरवत आनंद केला साजरा:जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, सरचिटणीस रणजीत देसाई यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांचा समावेश.. ओरोस ता ८आज दिल्ली येथे भाजपचे बहुमताचे सरकार आले 70 पैकी 45 उमेदवार निवडून आले. या भाजपच्या यशाचा जल्लोष महाराष्ट्रात सर्व ठिकाणी करण्यात आला. सिंधुदुर्गनगरी येथील वसंत स्मृती या सिंधुदुर्ग भाजप जिल्हा कार्यालय येथे भाजपा जिल्हा पदाधिकारी,…

Read More

राज्यस्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत खेमराजचा प्रणव गवस राज्य स्तरावर प्रथम…

⚡बांदा ता.०८-: अकोला येथे नुकत्याच संपन्न झालेल्या राज्य स्तरीय शालेय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत सिंधुदूर्ग जिल्यातील विविध वजनी गटांमध्ये 11 खेळाडूंची निवड झाली होती. विभागीय स्पर्धेत अव्वल कामगिरी करणाऱ्या या खेळाडूंनी राज्य स्तरावर सुध्दा सिंधुदूर्ग जिल्याचे उत्तम प्रतिनिधित्व केले. खेमराज मेमोरिअल इंग्लिश स्कूल व डॉ व्ही. के.तोरसकर कनिष्ठ महाविद्यालय बांदाचा वाणिज्य शाखेचा खेळाडू विद्यार्थी प्रणव भिकाजी…

Read More

वसई सावंतवाडी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली आमदार राजन नाईक यांची भेट…

वांद्रे – मडगाव सुपरफास्ट रद्द करून वसई – सावंतवाडी पॅसेंजर सुरू करण्याची केली मागणी… ⚡सावंतवाडी ता.०८-: वसई विरार परिसरामध्ये ६०% लोकवस्ती ही कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड येथील रहिवाशांची आहे,पश्चिम रेल्वेवरून कोकण रेल्वे मार्गावर नेहमीसाठी रेल्वे सुरू करावी अशी प्रवासी संघटनेची मागील १० वर्षापासूनची मागणी आहे,वसई विरारकरांना कोकणात जाणारी रेल्वे पकडण्यासाठी गर्दीतून दादर,CSMT किंवा कुर्ला…

Read More

राजधानी दिल्लीत भाजपची सत्ता,कणकवलीत भाजपचा कार्यकर्त्यांचा जल्लोष…

कणकवली : तब्बल सत्तावीस वर्षानंतर राजधानी दिल्लीत भाजपचे सरकार आले आहे. तर आपच्या दहा वर्षाच्या सत्तेला सुरुंग लागलाय. याचा जल्लोष देशासह राज्यात देखील मोठ्या उत्साहात होत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यात देखील भाजपच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी येथील बस स्थानकासमोर दिल्लीत भाजपची सत्ता येताच जोरदार फटाक्यांच्या आतिषबाजीसह, मोदी साहेब तुम आगे बढो…. हम तुम्हारे साथ है, भारतीय…

Read More
You cannot copy content of this page