राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेचे झंजावाती नियोजन दौऱ्याचे प्रमुख प्रमोद जठार यांच्या आढावा बैठकांची जोरदार सुरुवात
*⚡कणकवली दि.११-:* कोकणचे नेतृत्व ना. नारायणराव राणे यांची जन आशीर्वाद यात्रा १९ ते २६ ऑगस्ट या काळात मुंबईपासून ते सिंधुदुर्गपर्यंत निघत आहे. या झुंजार आणि अभ्यासू नेतृत्वाला मिळालेले केंद्रीय मंत्रीपद, रोजगाराच्या क्षेत्रात कोकणच्या बेरोजगारांना उभे करू शकण्याची क्षमता असणारे मध्यम, लघु व सुक्ष्म उद्योग मंत्रालय आणि कोकणातील सध्याची राजकीय स्थिती पाहता ही यात्रा प्रचंड जोशात…
