वाचन लेखनाने युवा पिढी प्रगल्भ होते
वाचक प्रेरणा दिनानिमित्त कार्यक्रमात कवयित्री उत्तरा जोशी यांचे प्रतिपादन *⚡देवगड ता.२०-:* वाचनामुळे अनेक व्यक्तींची प्रगती झाली आहे. यामुळे वाचनाला अनन्यसाधारण महत्व असून युवा पिढीने आपल्या शैक्षणिक अभ्यासाबरोबर अतिरिक्त वाचन केले पाहिजे. या वाचन लेखन प्रक्रियेतून युवा पिढी प्रगल्भ होत जाईल असे मत प्रसिध्दी कवयित्री उत्तरा जोशी यांनी हुर्शी येथील शेतकरी वाचनालयामधील वाचक प्रेरणा दिनानिमित्त आयोजित…
