सिंधुदुर्गनगरीतील समस्यांचे पालकमंत्र्यांना निवेदन
⚡सिंधुदुर्गनगरी ता.०८-: सिंधुदुर्गनगरी निर्मितीला पंचवीस वर्षे उलटली तरी जिल्हा मुख्यालयाचा विकास होऊ शकलेला नाही. केवळ विकासाची स्वप्ने दाखवली गेली. झालेले विकास प्रकल्प वापरावीना ओस पडलेत. त्यामुळे नियोजनबद्ध विकासासाठी सिंधुदुर्गनगरी विकास नियोजन व विचार विनिमय करण्यासाठी विशेष बैठकीचे आयोजन करण्यात यावे. अशी मागणी सिंधुदुर्गनगरी येथील सामाजिक कार्यकर्ते सुशील निब्रे यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे निवेदनाद्वारे केली…
