कोकणातील बारसू रिफायनरी विरोधातील जनआंदोलनाला दाक्षिणायनचा पाठिंबा
कोकणातील लेखक कविंसह राज्यातील साहित्यिक कलावंतांचा विरोध ⚡कणकवली ता.३०-: गेल्या काही दिवसांपासून कोकणातील बारसू रिफायनरी प्रकल्पाला स्थानिक जनतेचा विरोध अधिकाधिक तीव्र होत आहे. प्रस्तावित प्रकल्पामुळे होणारे प्रदूषण, त्यातून जैविक सृष्टीचा विनाश या गंभीर कारणांवरुन ग्रामस्थांनी जनआंदोलन उभे केले आहे. या आंदोलनाला विख्यात भाषातज्ज्ञ डॉ. गणेश देवी यांच्या पुढाकारात महाराष्ट्रातील मान्यवर लेखक कलावंतांनी पाठिंबा दिला आहे.यात…
