विद्यार्थ्यांनी एक उद्दिष्ट ठरवून त्यानुसार वाटचाल करावी – चंद्रहास टेमकर
⚡मालवण ता.०४-: स्पर्धा परीक्षाच्या माध्यमातून नोकरीच्या संधी उपलब्ध होत आहेत. स्पर्धा परीक्षांचा अभ्यासक्रम हा शालेय अभ्यासावरच आधारित असतो त्यामुळे विद्यार्थ्यांनी पुढील स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने आतापासूनच तयारी करावी. अभ्यासाचे नियोजन व वेळेचा सदुपयोग करावा. विद्यार्थ्यांनी एक उद्दिष्ट ठरवून त्यानुसार वाटचाल करावी असे प्रतिपादन राज्यकर अधिकारी चंद्रहास टेमकर यांनी येथे बोलताना केले. मालवण तालुक्यातील वराड येथील सौ.वि.भा.वरसकर…
