पदवीधर निवणूकीवर सावंतवाडी तालुक्यातील ग्रा.पं. कर्मचाऱ्यांचा बहिष्कार…

⚡सावंतवाडी ता.१७-: पदवीधर निवणूकीवर सावंतवाडी तालुक्यातील ग्रा.पं.कर्मचा-यांनी बहिष्कार टाकत मतदानाचा हक्क बजाविणार नाही असा निर्णय सर्वानुमते घेतला आहे. गटविकास अधिकारी काही ग्रामसेवकांच्या प्रशासनातील अनपढपणाला पाठीशी घालत असल्यामुळे तसेच अन्य गोष्ठींचे समर्थन करत असल्याने हा निर्णय घेण्यात आला असल्याचे संघटना अध्यक्ष हनुमान केदार व सचिव अशोक जाधव यांनी सागितले. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची बैठक आज पार पडली या…

Read More

पर्यावरण संवर्धनासाठी सामंजस्य करार…

युथ बिट्स फॉर क्लायमेट संस्था व स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाचा निर्णय.. ⚡मालवण ता.१७-: निसर्ग, पर्यावरण संवर्धन व संरक्षणाच्या च्या दृष्टीने विविध अभिनव उपक्रम राबविण्याच्या उद्देशाने मालवण मधील पर्यावरण विषयक उपक्रम राबविणाऱ्या स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय आणि पर्यावरण चळवळीतील अग्रणी संस्था युथ बिट्स फॉर क्लायमेट या दोन संस्थांमध्ये सामंजस्य करार झाला. या दोन्ही संस्थांनी…

Read More

चिवला बीच येथे ग्लोलिटर प्रकल्पांतर्गत स्वच्छता मोहीम…

⚡मालवण ता.१७-:भारतीय मत्स्यकी सर्वेक्षण गोवा बेस यांच्यामार्फत ग्लोलिटर प्रकल्पांतर्गत चिवला बीच येथे जनजागृती फेरी व प्लास्टिक कचरा स्वच्छता कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये मच्छीमार, नौका मालकांना समुद्रात टाकल्या जाणाऱ्या प्लास्टिकबाबत राजू नागपुरे यांनी माहिती दिली. तसेच किनाऱ्यावर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी मत्स्यव्यवसाय सहाय्यक आयुक्त सागर कुवेसकर, प्रधान वैज्ञानिक डॉ. प्रदीप, क्षेत्रीय प्रबंधक डॉ. एस. रामचंद्रन,…

Read More

आपली संस्कृती जपली पाहिजे…

विशाल परब:दशावतार नाटक मंडळींनी घेतली परब यांची भेट.. ⚡सावंतवाडी ता.१७-: तळकोकणची ओळख असणारे दशावतार हा खरे तर कोकणचा आत्मा! ही आपली संस्कृती, हा आपल्या जगण्यातील गाभा! हे सारे सारे जपले पाहिजे, वाढवले पाहिजे आणि महत्वाचे म्हणजे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित केले पाहिजे. असे प्रतिपादन भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी आज येथे…

Read More

सावंतवाडीतील युवकाचे रेल्वे प्रवासादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने निधन…

सावंतवाडी : सावंतवाडी उभाबाजार येथील रहिवासी विशाल नरेंद्र मसुरकर ( ४४ ) यांचे रेल्वे प्रवासादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. टॅक्स कन्सल्टंट म्हणून ते काम करीत असत. रेल्वे प्रवासात गया रेल्वे स्थानकादरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांच्या निधनाने मसुरकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, मुलगा, भाऊ, वहिनी, पुतण्या, पुतणी असा परिवार आहे.

Read More

आयुष्यात जे काय व्हाल त्यात टॉप बना…

ऍड सुहास सावंत: सकल मराठा समाज कट्टा दशकक्रोशीच्यावतीने दहावी, बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार ⚡ओरोस ता १७-: आता ए आय तंत्रज्ञान विकसित झाले आहे. हे तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणात स्वीकारले जाणार आहे. त्यामुळे खाजगी नोकऱ्या कमी होणार आहेत. जीवनात अधिकारी, व्यावसायिक अथवा शेतकरी व्हा पण जे काय व्हाल त्यात टॉप व्हा, असे आवाहन सकल मराठा समाजाचे जिल्हा…

Read More

आईच्या आकस्मित निधनाचा धक्का सहन न झाल्याने मुलाने रेल्वे रुळावरून उडी मारून संपविले जीवन…

देवगड (प्रतिनिधी) मिठमुंबरी येथील हितेश नंदकुमार गावकर वय २७ या युवकाने आईच्या आकस्मिक निधनाचा धक्का सहन न झाल्याने घाटकोपर येथे रेल्वे रुळावरून उडी मारून आत्महत्या करण्याची दुर्दैवी घटना रविवारी १६ जून रोजी सकाळच्या दरम्यान घडली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार मिठमुंबरी येथील नंदकुमार गजानन गावकरी यांच्या पत्नी सुषमा नंदकुमार गावकर व त्यांच्या मुलगा हितेश व त्यांचे…

Read More

कोकण पदवीधर मध्ये लोकसभेचा पराभव विसरून कीर यांना विजयी करू-:सुशांत नाईक…

⚡देवगड ता.१६-: रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांचा लोकसभेला झालेला पराभव धक्कादायकच आहे. यामध्ये धनशक्तीचा विजय झाला. आमची संघटना मजबूत नसल्याने थोड्याफार उणिवा जाणवल्या . यापुढे संघटना बांधण्याचे काम महत्त्वाचे आहे. कामाला लागा शिवसेना संपणार असे म्हणणाऱ्यांना जोपर्यंत तुमच्या आमच्यासारखे कार्यकर्ते आहेत तोपर्यंत शिवसेना संपणार नाही हे दाखवून द्या.तसेच कोकण पदवीधर…

Read More

ऑक्टोंबर मध्ये महाविकास आघाडीचे सरकार बसणार-:अमित सामंत…

⚡देवगड ता.१६-: रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीत पैशाचे वाटप झाले.पण पैशाच्या जोरावर विकला गेलेला मतदार कोकणातला आहे असे मला वाटत नाही. मतदारांना दोष देणे योग्य नाही असे मत शरद पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी व्यक्त केले. तसेच महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये एकमेकांवर विश्वास आहे. मात्र महायुतीत असे दिसत नाही असेही सामंत म्हणाले. रत्नागिरी सिंधुदुर्ग…

Read More

विधानसभेचे चांगले नियोजन करूया-: सतीश सावंत…

⚡देवगड ता.१६-: रत्नागिरी सिंधुदुर्ग निवडणुकी दरम्यान आम्ही जनतेमध्ये जाण्यात कमी पडलो .सात लाख मतदारांपर्यंत पैसे वाटण्याचा केविलवाला प्रयत्न राणे भाजपने केला राणे भाजप पैसे वाटल्याशिवाय निवडून येऊ शकत नाही.जेव्हा जेव्हा नारायण राणे यांनी शिवसेना संपवण्याची भाषा केली तेव्हा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये नवी उमेद व उत्साह येतो त्यामुळे आता विधानसभेसाठी चांगल्या पद्धतीने नियोजन करूया .असे प्रतिपादन यावेळी…

Read More
You cannot copy content of this page