मंत्री दीपक केसरकर यांचे स्पष्टीकरण:शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रकारचा गैरसमज करून घेऊ नये..
⚡सावंतवाडी ता.०३-: आपण कोणत्याही फळ बागायतदार शेतकऱ्यांना ताटकळत ठेवलेले नाही. आपली पूर्वीची सुरू असलेली मीटिंग संपण्यास उशीर झाल्याने आपणास सदर मीटिंग ठिकाणी पोचण्यास विलंब झाला असे स्पष्टीकरण शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिले असून, आपण त्यांना शुक्रवार दिनांक 5 एप्रिल रोजी भेटीची वेळ दिली असल्याची माहिती त्यांनी दिली. शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रकारचा गैरसमज करून घेऊ नये असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले आहे. यावेळी आपणाला मीटिंग साठी येण्यास उशीर होईल, आपण सर्व पदाधिकाऱ्यांनी थोडा वेळ थांबावे असा निरोप फोन वरून दिला होता. परंतु, पदाधिकारी निघून गेले होते असे ही ते यावेळी म्हणाले आहेत.
