⚡बांदा ता.१४-: मडुरा – मोरकेवाडी येथील शेतकरी विजय गवंडी यांच्या गाभण बकरीवर मगरीने हल्ला करुन फडशा पाडला. बकरींचा कळप पाण्यासाठी नदीवर आला असताना दबा धरुन बसलेल्या मगरीने बकरीवर हल्ला केला. या दुर्घटनेत गवंडी यांचे सुमारे १० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
सावंतवाडी वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर यांना घटनेची माहिती देण्यात आल्यानंतर पाडलोस वनरक्षक आप्पासो राठोड हे पंचनाम्यासाठी सावंतवाडीहून रवाना झाले आहेत. मगरींच्या दहशतीने शेतकर्यांमध्ये घबराट पसरली आहे. मगरींचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
