आंबा व काजू बागायतदार विचार मंचाची वेंगुर्ला तहसीलदार यांच्याकडे मागणी…
⚡वेंगुर्ला ता.२२-: वेंगुर्ला तालुक्यातील आंबा व काजू बागायतदार विचार मंचाचे सदस्य तसेच सर्व बागायतदार यांनी सन २०१५ मे २०१९ मधील महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेमधील २ लाखांवरील कर्जमाफी मिळावी असे निवेदन वेंगुर्ला तहसिलदार यांना दिले आहे.
सल २०१५ ते २०१९ मधील महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेमधील २ लाखांवरील कर्जमाफी मिळण्याबाबत शासनाने शेतक-यांना २ लाखांपर्यंत माफी दिली. परंतु, महत्त्वाची बाब म्हणजे २ लाखांपर्यंत मुद्दल असणा-या शेतक-याला व्याजामुळे शेतक-याला त्या कर्जमाफीच्या लाभांपासून वंचित रहावे लागले आहे. तरी शासनाने याचा गांभीर्याने विचार करुन आम्हा सर्व शेतक-यांना कर्जमुक्त करावे. तसेच ३० सप्टेंबरपर्यंत शासनाने कर्जमाफीचा निर्णय घेतला. परंतु, राज्यशासनाने शेतक-यांना दिलासा म्हणून ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत तरी याचा कालावधी वाढवून द्यावा आणि २०१५ ते डिसेंबर २०१९ पर्यंत २ लाखांवरील निर्णय घेऊन शेतक-यांचा सातबारा कोरा करुन द्यावा असे निवेदनात नमूद केले आहे.
यावेळी जयप्रकाश चमणकर, हनुमंत आंगचेकर, अनंत प्रभू, किशोर नरसुले, अॅड.प्रकाश बोवलेकर, शामसुंदर राय, राजेश परब आदी उपस्थित होते.
