⚡वेंगुर्ला ता.०४-: वेंगुर्ला तालुक्यातील वेंगुर्ला मठमार्गे कुडाळ / सावंतवाडी या मार्गांनजिक मठ ठाकूरवाडी येथील धोकादायक वळणावर विरुद्ध दिशेने रिक्षा असल्याने ती वाहतुकीस धोकादायक ठरत आहे. मागील चार दिवसांपासून संबंधित रिक्षा प्रवासी वाहतूक करीत असताना बंद पडली असल्याचे समजते. दरम्यान सध्या या मार्गालगत सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत साईडपट्टी सुरळीत करण्याचे काम सुरु आहे. मठ एरियात मागील कालावधीत अपघातांचे सत्र सुरूच आहे. संबंधित वळण कायम धोकादायक ठरत आहे. संबंधित रिक्षा ही रस्त्याच्या विरुद्ध दिशेने बंद पडल्याने तशीच ठेवण्यात आली आहे. त्यामुळे त्याठिकाणी कोणत्याही क्षणी अपघाताची दाट शक्यता आहे. संबंधित विभागाने याकडे तातडीने लक्ष पुरवावे, अशी मागणी वाहनधारकांतून करण्यात आली आहे.
मठ ठाकूरवाडी वळणानजिक उभी रिक्षा ठरतेय धोकादायक…
