Headlines

गोपुरी जीवन शिक्षण शाळेला वाढता प्रतिसाद…

सुमारे १२० विद्यार्थी झाले सहभागी… ⚡कणकवली ता.०८-: गोपुरी आश्रमच्या माध्यमातून पहिली ते नववी च्या विद्यार्थ्यांसाठी सुरू झालेल्या ‘जीवन मूल्य शिक्षण शाळा’ या उपक्रमास कणकवली व आजूबाजूच्या परिसरातील विद्यार्थ्यांचा वाढता प्रतिसाद मिळत आहे. मुलांसाठी हस्तकला प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. यावेळी प्रशिक्षिका अस्मिता परब यांनी विद्यार्थ्यांना मोबाईल पासून दूर ठेवण्यासाठी व स्वावलंबन शिकवण्याच्या उद्देशाने सुरू केलेल्या…

Read More

शो बाजी करून मच्छीमारांचे प्रश्न सुटणार नाहीत…

निलेश राणे:यापुढे समुद्रात अवैधरित्या मासेमारी करण्यास येणाऱ्या मलपीतील एकाही ट्रॉलरला परत जाऊ देणार नाही … ⚡मालवण ता.०८-: परप्रांतीय ट्रॉलर्सधारकांमध्ये जी भीती निर्माण करणे गरजेचे होती ती कशी होईल. त्यासाठीच आपल्याकडे असलेल्या ज्ञानाचा वापर करून जी ताकद दाखवण्याची गरज होती ती दाखविली. त्यामुळेच जिल्ह्याच्या किनारपट्टी भागात मलपीतील ट्रॉलर्स पकडण्याची कार्यवाही मत्स्यव्यवसाय खात्याकडून झाली. यातून मोठ्या प्रमाणात…

Read More

राष्ट्रवादीच्या कोकण विभागीय अध्यक्षपदी पुन्हा एकदा अर्चना घारे परब यांची फेर निवड…

⚡सावंतवाडी ता.०८-: राष्ट्रवादीच्या कोकण विभागीय अध्यक्षपदी पुन्हा एकदा अर्चना घारे परब यांची फेरनिवड करण्यात आली आहे.याबाबतचे नियुक्तीपत्र आज त्यांना अँड. रोहिणी खडसे यांच्या हस्ते देण्यात आले. संघटना बांधणी करिता अर्चना घारे यांच्याकडे पुन्हा एकदा ही जबाबदारी देण्यात आली आहे.

Read More

सामाजिक बांधिलकीकडून रुग्णांसाठी ५० ब्लॅंकेट्स उपजिल्हा रुग्णालयाला सुपूर्त…

⚡सावंतवाडी ता.०८-: थंडीचे प्रमाण वाढल्या कारणाने थंडीपासून रुग्णांचा बचाव होण्याकरिता सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान व राजधानी ट्रॅव्हलर्सचे ट्रॅव्हलर्स एजन्सी चे मालक शोभन भाई यांच्या संयुक्त विद्यमानाने राणी जानकीबाई सुतिका गृह व उपजिल्हा रुग्णालयात एकूण ५० ब्लॅंकेट्स देण्यात आली.राजधानी ट्रॅव्हल्स एजन्सी चे मालक शोभन भाई यांनी सदर ब्लॅंकेट संस्थेची सचिव समीरा खलील यांचे पती आमीन खलील यांच्याजवळ…

Read More

बॅ. नाथ पै पुण्यतिथीनिमित्त कुडाळ येथे १५ रोजी जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा…

⚡मालवण ता.०८-:बॅ. नाथ पै यांच्या ५४ व्या पुण्यतिथीनिमित्त बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्था कुडाळ येथे दि. १५ जानेवारी रोजी सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय शालेय (इयत्ता ८वी ते १२वी ) व खुल्या वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी शालेय गट- इयत्ता आठवी ते बारावीसाठी विषय: बॅ. नाथ पै आणि कोकणचा विकास, सामान्य जनतेचे कैवारी बॅ. नाथ…

Read More

मानसिक आरोग्यासाठी भावनिक बुद्धिमत्ता महत्त्वाची-:डॉ. रुपेश पाटकर…

⚡मालवण ता.०८-: भावनिक आरोग्य हे सामूहिक असते, त्यामुळे एकमेकांचे भावनिक आरोग्य सांभाळले पाहिजे, यासाठी भावनिक बुद्धिमत्ता आवश्यक असून ती विकसित केली पाहिजे. आपल्या मानसिक आरोग्यासाठी भावनिक बुद्धिमत्ता महत्वाची आहे, असे प्रतिपादन मानसोपचार तज्ज्ञ डॉ. रुपेश पाटकर यांनी येथे बोलताना केले. मालवण येथील युथ बिट्स फॉर क्लायमेट आणि इकोमेट्स व स.का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाचा आजीवन अध्यायान…

Read More

शिवसेना पक्ष वाढीच्यादृष्टिकोनातून उद्यापासून गाव तिथे शिवसेना शाखा अभियान सुरू…

आमदार निलेश राणे:आगामी काळात होणाऱ्या स्थानिक निवडणुकीत शिवसेना ताकदीने उतरणार.. ⚡मालवण ता.०८-: शिवसेना पक्ष वाढीच्यादृष्टिकोनातून उद्यापासून गाव तिथे शिवसेना शाखा अभियान राबविण्यात येणार असून या अभियानांतर्गत गावातील संघटना,गावातील बूथ सक्षम करण्यासाठी तसेच पक्षाला प्रत्येक बूथ वर जास्तीत जास्त मतदान कसे वाढेल यासाठी विशेष प्रयत्न केले जातील आगामी काळात येऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका,…

Read More

सीए परीक्षा उत्तीर्ण झालेल्या कट्टा येथील गौतम भोगटे व शीतल वायंगणकर यांचे माजी आमदार वैभव नाईक यांनी केले अभिनंदन…

⚡मालवण ता.०८-:मालवण तालुक्यातील कट्टा येथील गौतम दीपक भोगटे व शीतल उदय वायंगणकर हे दोन्ही विद्यार्थी चार्टर्ड अकाऊंटंट ( सी. ए.) परीक्षेत उत्तीर्ण होऊन दैदिप्यमान यश संपादन केले आहे. आपल्या यशातून कट्टा गावाच्या नावलौकिकात या विद्यार्थ्यांनी भर टाकली आहे. त्याबद्दल माजी आमदार वैभव नाईक यांनी दोन्ही विद्यार्थ्यांच्या निवासस्थानी भेट देऊन सत्कार करत अभिनंदन केले. यावेळी शिवसेना…

Read More

लोकवर्गणीतून सावंतवाडीसाठी रुग्णवाहिका घेणार, १० लाखाचा खर्च अपेक्षित…

सामाजिक बांधिलकी व ओंकार कलामंचचा उपक्रम; दानशूरांनी मदत करा, शैलेश पै यांचे आवाहन.. ⚡सावंतवाडी,ता.०८-: आपत्कालीन किंवा अपघातग्रस्त परिस्थितीत रुग्ण तसेच जखमींना तात्काळ सेवा उपलब्ध व्हावी यासाठी मोफत सेवा देणारी रुग्णवाहिका खरेदी करण्याचा संकल्प सामाजिक बांधिलकी व ओंकार कला मंच या संस्थांकडून घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे या उपक्रमांतर्गत १० लाख इतकी किंमत असलेली रुग्णवाहिका ही…

Read More

अन्य ठिकाणी पकडलेले वन्य प्राणी आंबोलीत सोडू नयेत…

आंबोली ग्रामस्थांची वन विभागाला निवेदनाद्वारे विनंती… ⚡आंबोली ता.०८-: आंबोली वन परीक्षेत्र मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्या व कोल्हापूर जिल्ह्यात पकडलेले वन्य प्राणी मुख्यत्वे माकड, बिबटा इत्यादी वन विभागामार्फत सोडण्यात येतात.आंबोली परिसरातील जनता गेली कित्येक वर्षे प्रलंबित असलेल्या कबूलयतदार गावकर जमीन प्रश्न मुळे फार मोठा प्रमाणात त्रस्त आहे. आंबोली परिसरातील येथील जनतेला कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई भेटत नाही…

Read More
You cannot copy content of this page