अस्तित्व प्रतिष्ठानच्या माध्यमातून पुरग्रस्तांना अत्यावश्यक वस्तू वाटप
*⚡कणकवली दि.१२-:* सामाजिक बांधिलकी अन् समाज भावना जपत अस्तित्व प्रतिष्ठान (रजि.) मुंबईच्या माध्यमातून कोकणातील पुरग्रस्त बांधवांना स्टिलच्या टाक्या, बादल्या, प्लॅस्टिकचे डब्बे, ब्लँकेट, टॉवेल, चटई, गाऊन, सॅनिटरी पॅड, अन्न धान्य तसेच काही भांडी अन् बिस्किट अशा जीवनावश्यक वस्तूंचे वाटप नुकतेच प्रतिष्ठान कार्यकर्त्यांच्या वतीने करण्यात आले. कोकणात महाप्रलयकाळी पावसाने हाहाकार माजवून पुरस्थिती निर्माण झाल्यांने तसेच दरड दुर्घटनेमुळे…
