Headlines

बांद्यात संत सोहिरा मठात श्रीगुरुपौर्णिमा उत्साहात

बांदा दि.14 (प्रतिनिधी)- बांदा येथिल संत सोहिरोबानाथ आंबिये मठात श्री गुरुपौर्णिमेचा उत्सव मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला.यानिमित्त मठात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.सकाळी नाथवंशज प्रसाद आंबिये यांनी नाथांच्या पादुकांचे पुजन केले.तसेच  उदय परांजपे यांच्या पौरोहित्याखाली अभिषेक करण्यात आला. त्यानंतर संत सोहिरोबानाथ चरित्रामृताचे वाचन करण्यात  आले.     सायंकाळी 4 वाजता भाविकांच्या…

Read More

फुटीर आमदारांचे प्रवक्ते दीपक केसरकर यांना जिल्ह्यात फिरू देणार नाही

केसरकर आधी तोंडाला लगाम घाला, राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांचा इशारा ⚡कणकवली ता.१४-:फुटीर आमदारांचे प्रवक्ते दीपक केसरकर यांच्या डोक्यात हवा गेली आहे. ते आपली लायकी विसरून बोलू लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांना आमदार केले मात्र खाल्ल्या मिठाला विसरलेले केसरकर हे सध्या पवार साहेबांवर टीका करत आहेत. त्यांनी ही टीका थांबवावी…

Read More

संदेश पारकर यांच्या वाढदिवसानिमित्त
रक्तदान शिबिरात १८१ दात्यांचे रक्तदान

⚡कणकवली ता.१४-: शिवसेना नेते तथा कोकण विकास समितीचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर यांच्या वाढदिनी व कै. सुबोध टिकले यांच्या स्मृती दिनानिमित्त येथील मातोश्री मंगल कार्यालयात रक्तदान शिबीर आयोजन केले होते. यात १८१ जणांनी रक्तदान केले. या शिबिराचे उदघाटन माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप यांच्या हस्ते झाले.यावेळी आम वैभव नाईक,जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत,युवा सेना…

Read More

वेंगुर्ला तालुका शिवसेनेची मासिक सभा संपन्न

पक्षाच्या राजकीय स्थिती व आमदार बांडखोरीवर झाली चर्चा वेंगुर्ला प्रतिनिधी- वेंगुर्ला तालुका शिवसेना पक्षाची तालुका कार्यकारिणीची मासिक सभा शिवसेना तालुका मध्यवर्ती कार्यालयात तालुकाप्रमुख यशवंत परब यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी सदर सभेच्या अनुषंगाने सद्यस्थितीत शिवसेना पक्षाची असलेली राजकीय परिस्थिती व राजकीय घडामोडीतील शिवसेनेतील आमदारांच्या बंडखोरीबाबत तसेच विविध विकास कामांबाबत चर्चा करण्यात आली.

Read More

आ केसरकर यांना नक्की काय झालेय ?

अर्चना घारे परब यांचा प्रश्न;पुन्हा शरद पवार यांच्या वि रोधात बोलल्यास जशास तसे उत्तर देण्याचा दिला इशारा ⚡सावंतवाडी ता.१४-: शांत संयमी सहनशील आणि सुसंस्कृत अशी ओळख निर्माण करून मतदार संघातील जनतेचा विश्वास घात करुन तीनवेळा निवडून येणाऱ्या आमदार दीपक केसरकर यांना नक्की काय झाले आहे. असा सवाल राष्ट्रवादीच्या कोकण विभागीय अध्यक्षा अर्चना घारे परब यांनी…

Read More

पद असो अथवा नसो ..जनतेचा विश्वास
आणि पाठबळ असेपर्यंत डगमगणार नाही

वाढदिवस कार्यक्रमात संदेश पारकर यांचे प्रतिपादन ⚡कणकवली ता.१४-: संकटाच्या काळात आम्ही रणांगण सोडलेले नाही. जनतेवर होणाऱ्या अन्यायाविरोधात आमची लढाई सुरु आहे. पद असो अथवा नसो जनतेचा विश्वास आणि पाठबळ जोपर्यंत आहे तोपर्यंत माझ्यासारखा नेता कधी डगमगणार नाही.तुम्ही साथ द्या… पाठबळ द्या… मी निश्चितपणे जनतेच्या भल्यासाठी काम करेन. कारण आम्ही लढवय्ये आहोत.आणि आमचा हा लढा ध्येयाचा…

Read More

कणकवली नगरपंचायतीला 2 कोटी 49 लाख रुपयांचा निधी मंजूर

नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी दिली माहिती ⚡कणकवली ता.१४-: नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर प्रथमच कणकवली नगरपंचायत ला नागरी सहाय्य योजना विकसित करणे या कामाकरिता 2 कोटी 49 लाख रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. आमदार नितेश राणे यांनी नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे यासंदर्भात मागणी केली होती. दोन दिवसांपूर्वीच…

Read More

आगीतील नुकसानग्रस्ताला केसरकरांकडून आर्थिक मदत

⚡वेंगुर्ला ता.१४-: वेंगुर्ला शहरातील साई मंगल कार्यालय समोरील कापड दुकानास सोमवारी रात्री आकस्मिक आग लागून मोठे नुकसान झाले होते. संबंधित नुकसानग्रस्त अलमास मुजावर यांना आमदार दिपक केसरकर यांनी २५ हजार रुपये त्वरित आर्थिक मदत दिली आहे. मोठे नुकसान झाल्याने त्यांना त्वरित आर्थिक मदत मिळावी यासाठी सचिन वालावलकर यांनी त्वरित पाठपुरावा केला. सदर मदतीचा चेक वेंगुर्ला…

Read More

संत गाडगेबाबा भाजी मंडई येथील कोसळलेले छप्पर दुरुस्त

माजी नगरसेवक आनंद नेवगी यांचा पाठपुरावा ⚡सावंतवाडी ता.१४-: मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे काही दिवसांपूर्वी शहरातील संत गाडगेबाबा भाजी मंडई येथील कोसळलेल्या त्या छपराचे काम नगरपालिकेने पूर्ण केले आहे. याबाबत माजी नगरसेवक आनंद नेवगी यांनी लक्ष वेधले होते. याबाबत अधिक वृत्त अस की गेल्या काही दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे हे छप्पर कोसळले होते. त्यामुळे त्या ठिकाणी बसणाऱ्या…

Read More

नगराध्यक्ष, सरपंच थेट लोकांमधूनच निवडला जाणार,

मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक मोठी घोषणा केलीयं. नगर परिषदेच्या निवडणुका आता थेट होणार आहेत. ग्रामपंचायतीचे सरपंच थेट निवडून येतील. बाजार समितीत शेतकऱ्यांना मतदान करण्याचा अधिकार बहाल करण्यात आला आहे. 2020 ला तो रद्द केला होता. मात्र, आता मुख्यमंत्र्याच्या घोषणेप्रमाणे नगराध्यक्ष आणि सरपंच थेट लोकांमधून निवडले जाणार आहेत. इतकेच नाही तर…

Read More
You cannot copy content of this page