Headlines

वेंगुर्ले तेली समाज मंडळाच्यावतीने ७ ऑगस्ट रोजी सत्कार

तीन वर्षातील गुणवंतांचा करणार सत्कार ⚡वेंगुर्ला ता.३१-: सिधुदुर्ग जिल्हा तेली समाज उन्नती मंडळ शाखा वेंगुर्ला तर्फे तालुक्यातील मागील २ वर्षातील आणि चालु वर्षातील दहावी, बारावी आणि पदवीधर उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ ७ ऑगस्ट रोजी तुळस सरकारी रुग्णालयाजवळील शशिकांत तेली यांच्या निवासस्थानी सायं.४ वा. आयोजित करण्यात आला आहे. ज्या विद्यार्थ्यांना ८० टक्के पेक्षा जास्त गुण आहेत…

Read More

कडोबा बचतगटाचे शिवसेनेच्यावतीने अभिनंदन

कांदळवन संवर्धनासाठी राज्यात मिळाला आहे प्रथम क्रमांक ⚡वेंगुर्ला ता.३१-: महाराष्ट्रात कांदळवन संवर्धनामध्ये प्रथम क्रमांक आलेल्या व कांदळवन संवर्धनासाठी प्रभावी कार्य केलेल्या कडोबा बचत गट टांक यांचा वेंगुर्ला तालुका शिवसेनेच्यावतीने अध्यक्ष नरेंद्र मोंडकर यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन उपजिल्हाप्रमुख बाळा दळवी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी तालुकाप्प्रमुख यशवंत परब, शहर प्रमुख अजित राऊळ, उपजिल्हाप्रमुख…

Read More

इनरर्व्हील क्लबच्यावतीने महिला, कॉलेज युवतींसाठी आरोग्य व कॅन्सर जनजागृतीचे आयोजन

लाभ घेण्याचे अध्यक्ष दर्शना रासम यांचे आवाहन ⚡सावंतवाडी ता.३१-: इनरव्हील क्लबच्यावतीने दरवर्षी शैक्षणिक, सामाजिक, आरोग्य व प्रबोधनात्मक उपक्रम राबविण्यात येत असून यावर्षी डिस्ट्रिक्ट कडून आलेल्या गोल प्रमाणे महिलांसह शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थिनींचे आरोग्य व कॅन्सर व्हॅक्सिनबाबत अवेअरनेस कॅम्पचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच शाळांना सॅनिटरी पॅड डिस्पोजेबल आणि वेंडिंग मशीन देण्यासह समाज उपयोगी उपक्रम वर्षभर…

Read More

न्हावेली गावा साठी स्वतंत्र वायरमन द्या

न्हावेली ग्रामस्थांमधून होत आहे मागणी ⚡सावंतवाडी ता.३१.- गणेश चतुर्थी सण अवघ्या एका महिन्यावर येऊन ठेपला असून न्हावेली गावात नेहमी विजेचा खेळखंडोबा सुरु आहे. वाहिन्यांना लागणारी झाडीझुडपे त्रासदायक ठरत असून वीज समस्या संदर्भात विचारणा केली असता वायरमनकडून उध्दट उत्तरे मिळत असल्याने न्हावेली गावासाठी स्वतंत्र वायरमनची नियुक्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थामधून होत आहे न्हावेली गावातील विजेसंदर्भात तक्रारीसाठी…

Read More

मळगाव-रेडकरवाडी रस्त्याची श्रमदानातून साफसफाई

उपसपंच हनुमंत पेडणेकर यांच्या नेतृत्वाखाली रेडकरवाडी युवकांनी एकत्र येत केली साफसफाई ⚡सावंतवाडी ता.३१सहदेव राऊळ-: मळगाव येथील १७ नंबर हायवे ते रेडकरवाडी रस्त्याची मळगाव उपसपंच हनुमंत पेडणेकर यांच्या नेतृत्वाखाली रेडकर वाडीतील युवकांनी एकत्र येत श्रमदानातून साफसफाई केली. १७ नंबर हायवे ते रेडकरवाडी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात झाडी वाढली होती. त्यामुळे वाहने चालवताना वाहनधारकांना तसेच पादचाऱ्यांना चालतानाही त्रास…

Read More

कणकवलीत उद्या ‘अण्णा भाऊ साठे आठवणीचा जागर’ कार्यक्रम

⚡कणकवली ता.३१-: आपल्या साहित्य लेखनातून उपेक्षित-शोषित घटकांच जगणं समाजासमोर हाणून विदेशातही कीर्ती मिळविलेल्या अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती निमित्त अण्णा भाऊ साठे साहित्य परिषदेच्या वतीने कणकवली विद्यामंदिर हायस्कूल समोरील महाराजा सभागृहात सोमवार १ ऑगस्ट रोजी सायं. ४ वा. “अण्णाभाऊ साठे आठवणींचा जागर” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे साहित्य परिषदेचे राज्य…

Read More

प्रणय राणेची यु मुंबा संघात निवड ही सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारी

यंगस्टार मित्रमंडळातर्फे कणकवलीत प्रणय राणेचा सत्कार सोहळा ⚡कणकवली ता.३१-: प्रो कबड्डीच्या ९ व्या पर्वासाठी यु मुंबा संघात एन . वाय . पी . कॅटेगरीमधून यंगस्टार मित्रमंडळाचा कबड्डीपटू प्रणय राणे याची निवड झाली आहे . प्रणयची निवड कणकवली तालुक्यासाठी व सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरारोवणारी आहे . प्रणय राणे याची निवड झाल्याबद्दल मंडळाचा अध्यक्ष म्हणून मला…

Read More

केंद्रस्तरीय स्पर्धांमध्ये आडवली शाळेचे यश

⚡मालवण ता.३१-: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित केंद्रस्तरीय स्पर्धांमध्ये जिल्हा परिषद शाळा आडवली नं. १ च्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. वक्तृत्व स्पर्धा : पहिली ते चौथी- द्वितीय-धम्मतेजा पल्लव कदम, तृतीय-मनस्वी पल्लव कदम. निबंध स्पर्धा पहिली ते चौथी- प्रथम- मनस्वी पल्लव कदम, पाचवी ते सातवी- तृतीय-विक्रांती प्रवीण साटम, मनस्वी कदम आणि विक्रांती साटम यांच्या निबंधांची मालवण तालुकास्तरीय…

Read More

मालवण व्यापारी बांधवांच्या गुणवंत मुलांचा ११ रोजी सत्कार

⚡मालवण ता.३१-: मालवण तालुक्यातील व्यापारी बांधवांच्या गुणवंत मुलांचा सत्कार प्रतिवर्षी प्रमाणे नारळी पौर्णिमेचे औचित्य साधून ११ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५.३० वाजता दैवज्ञ भवन, मालवण येथे आयोजित केलेला आहे. दहावी, बारावी, शिष्यवृत्ती व अन्य क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळवलेले असल्यास तेही विद्यार्थी सत्कारास पात्र असतील. ७५ टक्केहून अधिक गूण मिळविणाऱ्या सर्व गुणवंतांचा सत्कार करण्यात येणार आहे. तसेच…

Read More

युवा पिढीला नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी मार्गदर्शनाची गरज

सामाजिक बांधिलकी संघटनेचे रवी जाधव यांचे आवाहन ⚡सावंतवाडी ता.३१-: जनतेचा भलं करणाऱ्या विचाराच राजकारण आणि नेते आज देशभरात विविध विषयांनी गाजत आहेत मात्र महागाई बेरोजगारी आणि आरोग्य सुविधा याबाबत कोणालाही गांभीर्य नसून राजकारण जोमात आणि युवा पिढी कोमात अशी म्हणण्याची वेळ आली बेरोजगारीमुळे युवकांच्या आत्महत्येची संख्या वाढवली असून हे थांबवायची असल्यास राजकारण व नेत्यांचा विचार…

Read More
You cannot copy content of this page