Headlines

निगुडे- गावठाणवाडी रस्त्याचे उद्घाटन शिवसेना तालुकाप्रमुख नारायण उर्फ बबन राणे यांच्या हस्ते

⚡बांदा ता.२७-: निगुडे गावठाणवाडी रस्ता गेले अनेक वर्ष खड्डेमय होता. निगुडे गावचे माजी सरपंच समीर गावडे यांनी सातत्याने पाठपुरावा करत सदर रस्त्यासाठी निधीची मागणी केली होती. शिवसेना तालुकाप्रमुख नारायण उर्फ बबन राणे यांनी तात्काळ दखल घेऊन महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री श्री. दीपक केसरकर यांच्या निधीतून सदर रस्ता मंजूर करून आणला हा रस्ता आज नागरिकांसाठी खुला…

Read More

मालवण शासकीय तंत्रनिकेतनच्या १३१ विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीसाठी निवड

⚡मालवण ता.२७-: मालवण येथील शासकीय तंत्रनिकेतन मधील २०२२-२३ या शैक्षणिक वर्षातील अंतिम वर्षात शिकणाऱ्या १३१ विद्यार्थ्यांची कॅम्पस मुलाखती द्वारे विविध नामांकित कंपन्यांमध्ये निवड झाल्याची माहिती संस्थेचे प्राचार्य डॉ. सुरेश पाटील यांनी दिली आहे. पुणे येथील वाहन उद्योगातील अग्रगण्य बजाज ऑटो कंपनीने इलेक्ट्रिकल-१६, इलेक्ट्रोनिक्स-०८ तसेच मेकॅनिकलच्या ७ विद्यार्थ्याची निवड केली. जॉन डीअर या कंपनी मध्ये इलेक्ट्रिकल-०१…

Read More

पालकमंत्री रविंद्र चव्हाण २९ व ३० रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

⚡सिंधुदुर्गनगरी ता.२७-: सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री तथा पालकमंत्री रविंद्र चव्हाण हे दि.२९ व 30 मे 2023 रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. सोमवार, दिनांक 29 मे 2023 रोजी सकाळी 6.50 वा. गोवा (दाबोलिम) विमानतळ येथे आगमन व केसरी जि. सिंधुदुर्गकडे प्रयाण. सकाळी…

Read More

मालवण शहराला पुरेसा पाणी पुरवठा नाही

माजी उपनगराध्यक्ष जावकर यांची नाराजी मालवण दि प्रतिनिधीमालवण शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धामापूर नळपाणी योजनेच्या दोन मुख्य पंपापैकी एक पंप बंद पडला असून सध्या एकाच पंपवरून तलावातील पाणी सक्शन होऊन पाणी पुरवठा होत आहे. यामुळे एकाच पंपवर ताण येत असून शहराला नियमित व पुरेसा पाणी पुरवठा होत नसल्याबाबत माजी उपनगराध्यक्ष महेश जावकर यांनी लक्ष वेधले आहे….

Read More

वंदे मातरम् एक्सप्रेसला सावंतवाडी येथे थांबा द्या

रखडलेल्या सावंतवाडी टर्मिनसच्या कामाला गती द्या;राष्ट्रवादी विभागीय अध्यक्षा अर्चना घारे परब यांची मागणी ⚡सावंतवाडी ता.२७-: सावंतवाडी रेल्वे स्टेशन येथे मुंबई – गोवा वंदेभारत एक्सप्रेसला थांबा मिळावा तसेच सावंतवाडी टर्मिनसच्या रखडलेल्या कामात लक्ष घालण्याची मागणी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या कोकण विभाग अध्यक्षा अर्चना घारे यांनी खासदार सुप्रियाताई सुळे यांच्याकडे केली आहे. सी.एस.एम.टी ते मडगाव या मार्गावर नव्याने…

Read More

नडगिवे येथील पाईप लाईनसाठी खोदलेल्या गटाराची बाजूपट्टी करण्याचे आदेश

बांदा सरपंच, उपसरपंच यांना कार्यकारी अभियंता यांची माहिती बांदा/प्रतिनिधीगॅस पाईप लाईन टाकण्यासाठी महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड कंपनीने बांदा-दोडामार्ग रस्त्यावर गडगेवाडी येथे खोदाई केल्याने या कंपनीला तात्काळ बाजूपट्टीचे डांबरीकरण करण्याचे आदेश देण्यात आल्याची लेखी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता अनामिका चव्हाण यांनी दिली आहे. बांदा सरपंच प्रियांका नाईक, उपसरपंच जावेद खतीब यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत सदस्यांनी…

Read More

भाजपातर्फे बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार

⚡वेंगुर्ला ता.२७-: बारावी परीक्षेत घवघवीत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा भाजपातर्फे त्यांच्या घरी जाऊन त्यांचा सत्कार केला.

Read More

कणकवली गणपतीसान्या जवळील केटी बंधाऱ्याचे माती परीक्षण सुरू

समीर नलावडे, बंडू हर्णे यांनी वेधले होते बांधकाम मंत्र्यांचे लक्ष ⚡कणकवली ता.२७-:गेली कित्येक वर्ष कणकवली व जानवलीला जोडणाऱ्या जानवली नदीवरील गणपती साना येथील केटी बंधाऱ्याच्या कामाची मागणी आता पूर्ण होण्याच्या आशा पुन्हा एकदा पल्लवीत झाल्या आहेत.जानवली नदीवर या ठिकाणी केटी बंधारा करण्याच्या दृष्टीने माती परीक्षणाचे काम हाती घेण्यात आले आहे.राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. रविंद्र…

Read More

खेळाडू प्रशिक्षण आणि इतर बाबीसाठी आर्थिक सहाय्य मिळण्यासाठी प्रस्ताव सादर करावा;

जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस ⚡सिंधुदुर्गनगरी ता.२७-: अधिकृत आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तसेच सहभागी झालेल्या होतकरु खेळाडूंना प्रशिक्षण व इतर बाबीसाठी आर्थिक सहाय्य करण्याबाबतचा प्रस्ताव सादर करावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी केले आहे. राज्यातील खेळाडूंना अधिकृत आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रातील खेळाडूंना आर्थिक सहाय्य देणे बाबतचा शासन निर्णयामध्ये नमूद १४ अधिकृत…

Read More

कवी गोविंद काजरेकर यांच्या सुन्नतेचे सर्ग काव्यसंग्रहाला दुसरा पुरस्कार

बांदा/प्रतिनिधीगोविंद काजरेकर यांच्या ‘सुन्नतेचे सर्ग’ या दुसऱ्या कवितासंग्रहाला दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा कोल्हापूरचा धम्मपाल रत्नाकर हा राज्यस्तरीय पुरस्कार शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. गोविंद काजरेकर हे महाराष्ट्रातील एक नामवंत कवी आणि समीक्षक असून त्यांचे या आधी ‘उरल्या सुरल्या जगण्याचे रिमिक्स’ हा कवितासंग्रह तर ‘राजन गवस यांचे कथात्म साहित्य’,…

Read More
You cannot copy content of this page