न्हावेली गावातील जीर्ण वीज खांब बदलण्याची उपसरपंच अक्षय पार्सेकर यांची महावितरणकडे मागणी…
सावंतवाडी : न्हावेली गावातील पार्सेकरवाडी ते कुंभारभाट परिसरातील मुख्य विद्युत लाईनवरील सुमारे १० ते १२ खांब जीर्ण व धोकादायक स्थितीत असल्याने ते तातडीने बदलण्यात यावेत, अशी मागणी उपसरपंच अक्षय गुंडू पार्सेकर यांनी निवेदनाद्वारे महावितरणकडे केली आहे. हे खांब शेतजमिनीत उभे असून पावसाळ्यात पडण्याच्या स्थितीत आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिक आणि शेतकऱ्यांसाठी गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता…
