चाकरमानी मतदारांसाठी विशेष रेल्वे सोडण्याची मागणी…
कणकवली : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक बुधवार, २० नोव्हेंबरला होत आहे. निवडणुकीच्या निमित्ताने शंभर टक्के मतदान होण्यासाठी प्रशासन विविध उपक्रम राबवित आहे. मात्र, कोकणातील अनेक मतदार मुंबई व इतर उपनगरामध्ये राहतात. सध्या नियमित सर्व रेल्वे गाड्या फुल्ल असून तात्काळ तिकीट मिळणेही दुरापास्त आहे. त्यामुळे चाकरमानी मतदारांना कोकणात मतदानाला जाता यावे, यासाठी १९ रोजी जादा विशेष रेल्वे…
