शब्द कवितेचा आत्मा, भावना असते…
नमिता किर:कविता संमेलनात सातत्यपूर्ण आयोजनाचे केले कौतुक.. सावंतवाडी : कधीतरी कवयित्री संमेलन आयोजित करणे सोपे आहे. परंतु, सातत्याने ते टिकवून ठेवणे अवघड आहे. सावंतवाडीतील या सातत्यपूर्ण संमेलनाकरिता आयोजकांचे फार कौतुक आहे. महाराष्ट्राला चांगल्या कवयित्रींचीपरंपरा आहे. उत्तम कविता लिहिण्यासाठी इतर कवितांचे वाचन करावे. अन्य कवितांच्या अनुकरणाने आपली कविता समृद्ध होते. चांगल्या गोष्टींचे अनुकरण करण्यात कोणताच कमीपणा…
