Headlines

Global Maharashtra Breaking News

बांदा-वाफोली रस्ता चिखलमय…

वेळोवेळी निवेदने देऊन सुद्धा वरिष्ठ अधिकाऱ्यांचे कानाडोळा:कार्यवाही न झाल्यास प्रसंगी रस्त्यावर चिखलात बसून आंदोलन; डॉ. संजय सावळ.. ⚡बांदा ता.२३-: वाफोली, विलवडे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरु असलेल्या काळ्या दगडाच्या खणीतून पावसात देखील डंपर मधून वाहतूक सुरु असल्याने बांदा-वाफोली रस्ता चिखलमय बनला आहे. वेळोवेळी निवेदने देऊन तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लक्ष वेधूनही कानाडोळा होत असल्याने याठिकाणी अपघाताची शक्यता…

Read More

मुसळधार पावसामुळे निगुडेत विद्युत पोल कोसळला…

बांदा/प्रतिनिधीनिगुडे पाटीलवाडी येथे आज मुसळधार वादळी पावसात वीज खांब उन्मळून पडल्याने वाडीतील वीज पुरवठा खंडित झाला. मात्र महावितरणचे अधिकारी व स्थानिक वायरमन फोन उचलत नसल्याने स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेले चार दिवस मुसळधार पाऊस सुरु आहे. आज दुपारी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात वीज खांब कोसळला. यामध्ये वीज तारा तुटल्याने वीज पुरवठा खंडित झाला….

Read More

जिल्ह्यात अकरावीच्या प्रवेशासाठीऑनलाइन प्रवेश अव्यवहार्य असून, ऑफलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू करा…

रुपेश राऊळ यांची मागणी:सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डोंगराळ भागात नेटवर्क नसल्याने विद्यार्थ्यांचे हाल.. ⚡सावंतवाडी ता.२३-: शिक्षण विभागाचा इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठीचा ऑनलाइन पद्धतीचा निर्णय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि पालकांसाठी मनस्तापाचे कारण ठरला आहे. डोंगराळ आणि नेटवर्कच्या समस्येने ग्रासलेल्या या जिल्ह्यात ऑनलाइन प्रवेश अव्यवहार्य असून, ऑफलाइन प्रवेश पूर्ववत सुरू करण्याची मागणी ठाकरे शिवसेना विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ…

Read More

शिवसेना उपतालुकाप्रमुख अक्षय पार्सेकर यांची न्हावेली ग्रामस्थांसह महावितरण कार्यालयाला धडक…

तात्काळ दखल घेत महावितरणकडून वीज दुरुस्तीच्या कामाला सुरुवात… ⚡सावंतवाडी ता.२३-: मान्सून पुर्व पावसाच्या तडाख्याने गेले चार दिवस न्हावेली गावातीलविद्युतपुरवठा ठप्प होता, यामुळे गावातील नागरीकांची मोठी गैरसोय होत होती, यामुळे संतप्त ग्रामस्थांनी शिवसेना उपतालुकाप्रमुख तथा न्हावेली उपसरपंच यांच्या नेतृत्वाखाली महावितरणच्या सावंतवाडी कार्यालयात जाऊन सावंतवाडी ग्रामीण भागातील सहाय्यक अभियंता श्री.खांडेकर यांना जाब विचारत चांगले धारेवर धरले.यावेळी महावितरण…

Read More

ऑरेंज अलर्टमुळे स्वच्छ वेंगुर्ला दौडमध्ये बदल…

वेंगुर्ला प्रतिनिधी – वेंगुर्ला नगरपरिषदेच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त २५ मे रोजी ‘स्वच्छ वेंगुर्ला दौड‘ आयोजित केली होती. परंतु, ऑरेंज अलर्ट असल्यामुळे यात बदल करण्यात आला असून संबंधित दौड ही जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून गुरूवार दि.५ जून रोजी घेण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी याची नोंद घेऊन ५ जून रोजी दौडसाठी उपस्थित रहावे असे आवाहन…

Read More

अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनावर आधारित निबंध स्पर्धा…

वेंगुर्ला प्रतिनिधी – पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर एक आदर्श शासिका आणि जनसेविका म्हणून ओळखल्या जातात. यंदाचे हे त्यांचे ३००वे जन्मवर्ष आहे. त्यांचे विचार तरूणांपर्यंत पोहोचावेत या उद्देशाने वेंगुर्ला भाजपातर्फे अहिल्याबाई होळकर यांच्या प्रेरणादायी जीवनावर आधारित वेंगुर्ला तालुकास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन केले आहे.

Read More

श्री रामसीतेच्या मूर्तीची पुनःप्राणप्रतिष्ठापना संपन्न…

⚡वेंगुर्ला ता.२३-: येथील प्रसिद्ध श्री रामेश्वर मंदिरात नूतन बांधण्यात आलेल्या श्री राम मंदिरात शुक्रवारी श्री रामसीतेच्या मूर्तीची पुनःप्राणप्रतिष्ठापना तसेच कलशारोहण करण्यात आले.

Read More

पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची शनिवारी बैठक…

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून मान्सूनपूर्व पाऊस पडत आहे. सततच्या पावसाने निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेऊन जनजीवन सुरळीत होण्यासाठी करावयाच्या उपाय योजनांसाठी पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. ही बैठक शनिवार दि. २४ मे रोजी सकाळी ९ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडणार आहे. या बैठकीला…

Read More

कणकवलीत २६ मे रोजी रक्तदान शिबीर…

कणकवली : कणकवलीतील बाळगोपाळ हनुमान मित्र मंडळाच्यावतीने सोमवार २६ मे रोजी सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत बाळगोपाळ हनुमान मंदिर व धर्मराज महाराज समाधी स्थान येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. शनी जयंतीनिमित्त हे शिबिर आयोजित केले असून जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. शिबिरासंबंधी अधिक माहितीसाठी अनिल अणावकर, योगेश…

Read More

मुसळधार पाऊस सुरू ; कणकवली आचरा मार्ग पुलाचे काम सुरू असल्याने बंद  

कणकवली : तालुक्यातील वरवडे पुलाचे काम अपूर्ण राहिल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला आहे. कणकवली ते आचरा आणि आचरा ते कणकवली येथे येण्यासाठी नागरिकांना चार किलोमीटर चा प्रवास करून कलमठ कुंभारवाडी मार्गे जावे लागणार आहे. यावर्षी पावसाळ्यापूर्वी वरवडे येथील पुलाचे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र हे काम अपूर्ण स्थितीत राहिले आहे. गेले सहा महिने…

Read More
You cannot copy content of this page