Global Maharashtra Breaking News

डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे यांना मुदतवाढ द्या…

देव्या सुर्याजी यांची मागणी:डॉ. विशाल रेड्डी यांच्या नावाचाही विचार करा.. ⚡सावंतवाडी ता.१०-: उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असणाऱ्या वैद्यकीय अधिक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे यांचा कार्यकाळ येत्या ३१ मे रोजी संपत असून रुग्णालयातील भेडसावणाऱ्या समस्या व भरली न गेलेली रिक्तपद या पार्श्वभूमीवर कोरोना काळात डॉ. उत्तम पाटील व डॉ. ज्ञानेश्वर दुर्भाटकर यांच्याप्रमाणे डॉ. ऐवळे यांनाही २ वर्षांचा कार्यकाळ…

Read More

स्वगणना मोहिमेत सिंधुदुर्ग आघाडीवर…

जिल्ह्यातील १७ गावांतील सर्व कुटुंबांची स्व गणना पूर्णप्रशासन आणि नागरिकांच्या सहभागातून घडला आदर्श:वेंगुर्ल्यातील मूठ गाव ठरले राज्यातील पहिले १०० टक्के स्वगणना पूर्ण करणारे महसुली गाव.. ⚡सिंधुदुर्गनगरी,ता.१०-:स्वगणना मोहिमेत सिंधुदुर्ग जिल्ह्याने राज्यभरात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. वेंगुर्ला तालुक्यातील मूठ गावाने सर्व कुटुंबांची स्वगणना पूर्ण करत राज्यातील पहिले महसुली गाव म्हणून प्रथम क्रमांक पटकावला आहे. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे…

Read More

खारेपाटण परिसरात चक्रीवादळासह अवकाळी पावसाचा तडाखा…

घरांचे, शेतीचे व वीज यंत्रणेचे मोठे नुकसान.. ⚡कणकवली ता.०९-: खारेपाटण परिसरात शनिवारी सायंकाळी चक्रीवादळासह झालेल्या अवकाळी पावसाने मोठे नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यामुळे अनेकांच्या घरांची कौले व सिमेंट पत्रे उडून गेली असून अनेक ठिकाणी विद्युत पोल मोडून पडले आहेत. वीज वाहिन्या तुटून रस्त्यावर लोंबकळत असल्याने काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अनेक ठिकाणी झाडे…

Read More

कणकवलीत अतिक्रमण हटाव मोहिमेची तयारी…

वाहतूक कोंडीवर नगरपंचायतीचा कडक बडगा.. ⚡कणकवली ता.१०-: शहरातील वाढती वाहतूक कोंडी, पदपथांवरील अतिक्रमणे आणि अनधिकृत पार्किंगमुळे नागरिक त्रस्त झाले असून, या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी कणकवली नगरपंचायतीने आता कडक पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या आठ दिवसांत शहरात व्यापक अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात येणार असल्याची घोषणा नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केली. शहरातील अप्पासाहेब…

Read More

माजी आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून चिंदर अपराजवाडी येथे सभामंडपाची उभारणी…

वैभव नाईक यांच्या हस्ते झाले लोकार्पण.. ⚡मालवण ता.०९-:कुडाळ मालवणचे माजी आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून चिंदर अपराजवाडी येथील श्री ब्राह्मणदेव मंदिर तळी येथे सभामंडप बांधण्यात आलेल्या सभामंडपाचे लोकार्पण वैभव नाईक यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. यावेळी ग्रामस्थांनी वैभव नाईक यांचा सत्कार करत त्यांचे आभार मानले. याप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपतालुकाप्रमुख पप्पू परुळेकर,…

Read More

जोरदार वारा आणि पावसाचा आचरा गावाला तडाखा; पडझडीने लाखोंचे नुकसान…

⚡मालवण ता.०९-:आचरा परिसरात शनिवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास सोसाट्याच्या वाऱ्यासह आणि गडगडाटासह आलेल्या मुसळधार पावसाने तडाखा दिल्याने मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडून घरांचे व दुकान गाळ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तर काझीवाडी येथील इमारतीवरील मोबाईल टॉवर कोसळल्याने बीएसएनएलचे नेटवर्क गायब झाले आहे. गेले दोन दिवस आचरा परिसरात जोरदार वारे वाहून ढगाळ…

Read More

पडेल कॅन्टीन येथे १२ रोजी भव्य धम्म मेळावा…

माजी मंत्री भाई गिरकर यांची माहिती: डॉ. भीमराव आंबेडकर, नीतेश राणे राहणार उपस्थित.. ⚡देवगड ता.०९-:देवगड तालुका बौद्धजन सेवा संघ, मौजे गिर्ये बौद्धजन विकास मंडळ, महिला सेवा संघ विजयदुर्ग विभाग व पंचशील महिला मंडळ (मुंबई व ग्रामीण) यांच्या संयुक्त विद्यमाने १२ मे रोजी सकाळी ११ वाजता पडेल कॅन्टीन येथील साई गणेश मंगल कार्यालय येथे भव्य धम्म…

Read More

पावशी येथे तरुणाची गळफास घेत आत्महत्या…

⚡कुडाळ ता.०९-: तालुक्यातील पावशी मिटक्याची वाडी येथील ३० वर्षीय युवकाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (ता. ८) सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास घडली. अमित अनिल पेडणेकर असे त्याचे नाव आहे. याबाबतची तक्रार सत्यवान सखाराम मयेकर (रा. पावशी मिटक्याची वाडी) यांनी कुडाळ पोलिसात दिली.याबाबत सविस्तर वृत्त असे की, संबंधित तरुणाचे वडील अनिल राजाराम पेडणेकर हे ४…

Read More

डॉ. रेड्डी खूनातील मुख्य आरोपीच्या पोलीस कोठडीसाठीचा रिव्हीजन अर्ज फेटाळला…

कणकवली : बेंगलोर येथील डॉ. श्रीनिवास रेड्डी यांच्या हाय प्रोफाईल खून प्रकरणातील मुख्य आरोपी आणि इस्टेट एजंट व्यंकटेश बाबू याला पुन्हा पोलीस कोठडीत घेण्यासाठीचा कणकवली पोलिसांचा रिव्हीजन अर्ज अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती व्ही. एस. देशमुख यांनी फेटाळला आहे. कनिष्ठ न्यायालयाने आरोपीला सुनावलेली न्यायालयीन कोठडी रद्द करून त्याला पुन्हा पोलीस कोठडी देण्यात यावी, यासाठी…

Read More

आडेली आंबेडकरनगर येथील ग्रामस्थांवर पाणी विकत घेण्याची वेळ…

” गंभीर ” बाबीकडे निकषमय शासन लक्ष पूरविल काय ? ⚡वेंगुर्ला ता.०९-: पावसाळा तोंडावर आला असताना वेंगुर्ला तालुक्यातील आडेली गावातील आंबेडकरनगर येथील ग्रामस्थांना पाण्याचा मुबलक पुरवठा होत नसल्याने पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. या भागातील येथील पाणीपुरवठा करण्यासाठी आडेली ग्रामपंचायत मार्फत सुरु असलेले विहिरीचे काम अपूर्ण असल्याने ग्रामस्थांवर “पिण्याचे पाणी विकत घेण्याची वेळ” आली आहे….

Read More
You cannot copy content of this page