Global Maharashtra Breaking News

आमदार नीलेश राणेंनी हातिवले टोलला विरोध का केला होता…?

वैभव नाईक यांचा सवाल:आठवत नसेल तर त्या जाहिराती माझ्याकडे पाहण्यासाठी केव्हाही उपलब्ध आहेत, .. कणकवली : आमदार नीलेश राणे यांनी माझ्यावर जे आरोप केले, त्यापेक्षा २०२३ मध्ये जेव्हा राजापूर-हातिवले येथील टोल सुरू झाला होता, त्यावेळी तो टोल बंद होण्यासाठी त्यांनी आंदोलनाची भाषा केली होती. त्यानंतर त्या टोलच्या ठेकेदाराने याच राणेंच्या वाढदिवसासाठी जाहिराती देऊन खर्च केला…

Read More

वादळानंतर सावंतवाडीत नुकसानाची सत्ताधारी नगरसेवकांकडून पाहणी…

⚡सावंतवाडी ता.२४-: शहारत झालेल्या वादळाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या नुकसानीची पाहणी सत्ताधारी नगरसेवकांकडून करण्यात आली. यावेळी आपल्या घराशेजारील जीर्ण व जीविताला धोकादायक वाटत असणाऱ्या झाडांची माहिती न.प. ला देऊन ती झाडं मालकांनी तोडून घ्यावीत, जेणेकरून हानी पोहचू नये असे आवाहन सभापती सुधीर आडीवरेकर यांनी केले. श्री. आडीवरेकर म्हणाले, रात्रीच्या वादळामुळे चार घरांवर झाड पडली आहेत. तीन ठिकाणी…

Read More

१५ मे पूर्वी सावंतवाडीतील सर्व रस्ते पूर्ण करणार…

नगराध्यक्षा श्रद्धा सावंत भोसले यांची ग्वाही: पाण्याच्या प्रश्नावर कोणी राजकारण करू नये ;विरोधकांना केले आवाहन.. ⚡सावंतवाडी ता.२४-:शहरातील सर्व रस्त्यांची कामे १५ मेपूर्वी पूर्ण करण्याची जबाबदारी आम्ही घेतली असून ती पूर्ण करून दाखवणार आहोत. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी सावंतवाडी शहर ‘चकचकीत’ केले जाईल, अशी ग्वाही नगराध्यक्ष श्रद्धा सावंत भोसले यांनी आज येथे दिली. त्या आयोजित पत्रकार परिषदेत बोलत…

Read More

खासदार नारायण राणे यांच्या प्रयत्नांतून हॉर्मुझमध्ये अडकलेले ११ मराठी युवक सुखरूप मायदेशी…

इराण इस्रायल युद्धात हॉर्मुझ समुद्रधुनीत अडकलेल्या कर्मचाऱ्यांची सुटका:कणकवलीत भेट घेऊन युवकांकडून राणेंचे आभार व्यक्त. ⚡कणकवली ता.२४-:इराण इस्रायल युद्धात इराकच्या जरबो बोटीवर हॉर्मुझ समुद्रधुनीत अडकलेल्या महाराष्ट्र राज्यातील ११ कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री खासदार,भाजप नेते नारायण राणे यांच्या प्रयत्नातून सुखरूप भारतात घरी आणण्यात आले आहे. या बोटीवर मालवण तालुक्यातील दांडी येथील प्रतीक प्रवीण खोचरेकर हा 23…

Read More

कणकवलीत पटवर्धन चौक ते किनई रस्त्यावर बंदिस्त गटार कामाला गती…

स्थानिक नागरिक व व्यापाऱ्यांशी नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी साधला संवाद:रस्त्याच्या डागडुजीचीही दिली ग्वाही.. कणकवली : शहरातील पटवर्धन चौक ते किनई रस्ता या महत्त्वाच्या मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा बंदिस्त गटार बांधकामाच्या अनुषंगाने नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी प्रत्यक्ष पाहणी करून स्थानिक नागरिक तसेच व्यापाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी नागरिकांनी नगरपंचायतीच्या विकास कामांना पूर्ण सहकार्य करण्याची भूमिका स्पष्ट करत समाधान…

Read More

“आमचा आवाज दाबू नका”…

नगराध्यक्षांना अँड. निता सावंत कविटकर यांचा थेट इशारा: आमच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तर दिलीच पाहिजे.. ⚡सावंतवाडी ता.२४-: नगरपालिकेच्या आयोजित कौन्सिल बैठकीत विरोधी पक्ष आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जोरदार शब्दयुद्ध पाहायला मिळाले. विरोधी पक्षाने उपस्थित केलेल्या प्रश्नांना नगराध्यक्षांकडून समाधानकारक व समर्पक उत्तरे दिली जात नसल्याचा आरोप करत शिंदे शिवसेना नगरसेविका अँड. नीता सावंत यांनी नगराध्यक्षांना थेट इशारा दिला. यावेळी…

Read More

ओसरगाव टोल नाक्याविरोधात सिंधुदुर्गात पुन्हा रणशिंग…

टोलमाफी द्या किंवा पर्यायी राज्य मार्ग द्या; अन्यथा आंदोलनाचा इशारा.. कणकवली : ओसरगाव येथील टोल नाका मे महिन्यापासून कार्यान्वित होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघ आणि टोल मुक्त कृती समितीने पुन्हा एकदा टोलविरोधी भूमिका घेतली आहे. सिंधुदुर्गातील सर्व वाहनांना टोलमाफी द्यावी किंवा ओसरगाव येथे पर्यायी राज्य मार्ग तयार करावा, अशी मागणी करण्यात आली आहे….

Read More

कणकवलीत २९ एप्रिलला ‘सकल हिंदू संमेलन’; हिंदू समाज संघटित होण्यासाठी विराट सभेचे आयोजन…

⚡कणकवली ता.२४-:हिंदू धर्म, परंपरा आणि संस्कृतीचे संवर्धन व संरक्षण करण्याच्या उद्देशाने कणकवली शहरात आगामी बुधवारी, २९ एप्रिल २०२६ रोजी भव्य ‘सकल हिंदू संमेलनाचे’ आयोजन करण्यात आले आहे. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सायंकाळी ५ ते ८ या वेळेत हे संमेलन पार पडणार आहे. अयोध्या येथील श्रीराम मंदिर निर्मितीच्या ऐतिहासिक घटनेनंतर हिंदू समाजासमोर असलेल्या नवीन…

Read More

सिंधुदुर्गात टोल वसुलीला तीव्र विरोध…

संदेश पारकर यांचा महामार्ग प्राधिकरणाला खडा सवाल:टोलमुक्त सिंधुदुर्ग अभियानात सर्वांनी सहभागी व्हावे.. कणकवली : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ओसरगाव येथे टोल नाका सुरू करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. प्राधिकरण दडपशाही, पोलीस बळाचा वापर करून टोल नाका सुरू करणार असेल तर टोलबंदीविरोधात लोकशाही मार्गाने आम्ही लढा देणार आहोत. प्राधिकरणाकडून टोलच्या खाली सिंधुदुर्गवासीयांची आर्थिक लूट करू पाहत आहे….

Read More

वादळी वाऱ्याने सावंतवाडीत२१ ठिकाणी झालेल्या नुकसानबाबत केसरकरांकडून मदतीचे आश्वासन…

सावंतवाडी : शहरात रात्री वादळी वाऱ्याने थैमान घालत मोठे नुकसान केले. यानंतर माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांनी घटनास्थळी जात नुकसानग्रस्त भागाची पहाणी केली. शहरात तब्बल २१ ठिकाणी नुकसान झाल्याची माहिती त्यांनी दिली. याबाबत तहसीलदार यांना ताबडतोब पंचनामा करायला सांगून चक्रीवादळाच्या प्रमाणकाखाली नुकसान भरपाई मिळण्यासाठी विशेष बाब म्हणून मदत करण्याच्या सुचना देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट…

Read More
You cannot copy content of this page