Global Maharashtra Breaking News

“लकरकोट (बांदा) येथे २६ एप्रिल रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन…

⚡बांदा ता.२५-: श्री दत्त मंदिर लकरकोट बांदा व सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक २६ एप्रिल रोजी सकाळी ९.३० वाजता भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.या स्तुत्य सामाजिक उपक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांच्या हस्ते होणार असून, परिसरातील रक्तदात्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रक्तदान करण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले…

Read More

निरोगी आयुष्याच्या घोषणा अन् शहरात दुर्गंधीचे साम्राज्य..

कणकवली नगरपंचायतीच्या कारभारावर नागरिकांचा सवाल.. कणकवली : नगरपंचायतीकडून निरोगी आयुष्याच्या घोषणा केल्या जात असल्या, तरी प्रत्यक्षात शहरात दुर्गंधी, अस्वच्छता आणि खराब रस्त्यांमुळे नागरिकांचे हाल होत असल्याचे चित्र समोर आले आहे. त्यामुळे शहरातील रोगराईला नेमके जबाबदार कोण, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. नगरपंचायतीसमोरील शिवाजीनगरकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यालगतची गटारे ठिकठिकाणी उघडी पडलेली आहेत. काही…

Read More

स्व-गणनेची संधी: १ ते १४ मे दरम्यान नागरिकांना ऑनलाईन माहिती नोंदवण्याचे आवाहन…

सावंतवाडी : भारत सरकारतर्फे घरसूची आणि गृहगणना लवकरच सुरू होणार आहे. यापूर्वी १५ दिवसांची एक विशेष सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे, ज्यामध्ये स्वतः आपली माहीती ऑनलाईन भरू शकता. जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्यात १ मे ते १४ मे दरम्यान स्व-गणना होणार आहे अशी माहिती तहसीलदार श्रीधर पाटील यांनी दिली. यात नागरिक आपल्या कुटुंबाची माहिती…

Read More

कातवड कुदळभाम येथील श्री महापुरुष देवस्थानचा २ रोजी रौप्य महोत्सवी वर्ष सोहळा…

⚡मालवण ता.२५-:मालवण तालुक्यातील कातवड कुदळभाम येथील श्री देव महापुरुष पार देवस्थानाच्या रौप्य महोत्सवी वर्ष – २५ व्या वर्धापन दिन सोहळ्या निमित्त शनिवार दि. २ मे रोजी विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. श्री देव महापुरुष देवस्थानच्या रौप्य महोत्सवी वर्षा निमित्त सकाळी १० वा. लघुरूद्र होम, दुपारी १ वा. महाआरती, दुपारी ३ वा. सत्यनारायण…

Read More

भारतीय कामगार सेनेच्या चिटणीसपदी नारायण उर्फ सुधा आंगणे यांची निवड…

⚡मालवण ता.२५-:भारतीय कामगार सेनेच्या चिटणीसपदी आंगणेवाडी गावचे सुपुत्र आणि कामगार नेते नारायण उर्फ सुधा आंगणे यांची निवड करण्यात आली आहे. उबाठा शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने ही निवड मुंबई दादर येथे जाहीर करण्यात आली. भारतीय कामगार सेनेच्या अध्यक्षपदी शिवसेना नेते आणि खासदार अरविंद सावंत यांची ही निवड करण्यात आली आहे.नारायण उर्फ सुधा…

Read More

कणकवली उपजिल्हा रुग्णालयात जागतिक हिवताप दिन साजरा…

मलेरिया निर्मूलनासाठी जनजागृती ; तपासणी व उपचार मोफत उपलब्ध.. कणकवली : उपजिल्हा रुग्णालय कणकवली येथे शनिवारी २५ एप्रिल रोजी जागतिक हिवताप दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सन २००७ मध्ये जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) ६० व्या अधिवेशनात मलेरिया हा केवळ आफ्रिका खंडापुरता मर्यादित नसून तो जागतिक स्तरावरील गंभीर आरोग्यविषयक प्रश्न असल्याचे अधोरेखित करण्यात आले. त्यामुळे ‘आफ्रिका…

Read More

शक्तिपीठ महामार्गाची अलाइनमेंट राधानगरी मार्गे फोंडाघाटला उतरवावी…

नगराध्यक्ष संदेश पारकर यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन.. सिंधुदुर्ग : नवीन रिवाईज शक्तिपीठ महामार्गाची अंतिम अलाइनमेंट राधानगरी मार्गे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील फोंडाघाट परिसरात उतरवून जिल्ह्याच्या पर्यटन व आर्थिक विकासाला चालना द्यावी, अशी मागणी नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, राधानगरी परिसराच्या जवळून प्रस्तावित महामार्ग जात असल्याने हा मार्ग राधानगरीमार्गे…

Read More

कुडाळ न्यायालयात ९ मे रोजी राष्टीय लोकअदालत…

⚡कुडाळ ता.२५-: मुंबई उच्च न्यायालय महाराष्ट राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सिंधुदुर्ग यांनी दिलेल्या निर्देशास अनुसरुन दिवाणी न्यायालय (क स्तर) कुडाळ येथे शनिवार दि. ९ मे २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता राष्टीय लोकअदालत आयोजीत करणेत आले आहे. तालुका विधी सेवा समिती कुडाळ व तालुका बार असाेशिएशन यांचे संयुक्त विदयमाने हे…

Read More

वादळी वाऱ्यामुळे सावंतवाडीत झालेल्या नुकसानाची पालकमंत्री नितेश राणे यांनी केली पाहणी…

नुकसानग्रस्तांना जास्तीत जास्त भरपाई देण्याचे आश्वासन; आपत्ती व्यवस्थापन टीम तैनात करण्याची तयारी.. ⚡सावंतवाडी ता.२५-: तालुक्यात मोठे नुकसान झाले असून त्याची माहिती तहसीलदारांनी दिली आहे. झालेल नुकसान मोठ असून जिल्हाधिकारी व प्रशासनाशी बोलून जास्तीत जास्त नुकसान भरपाई कशी मिळवून देता येईल ते बघू‌. जवळपास ६१ ठिकाणी नुकसान झाले असून शासनाच्या निकषानुसार तसेच चौकटी बाहेर जावून देखील…

Read More

वेंगुर्ला तालुक्यातीलवायंगणी ग्रामपंचायतीचा मानवतावादी निर्णय…

सरपंच अवी दुतोंडकर यांच्या निर्णयाचे तालुक्यातून कौतुक.. ⚡वेंगुर्ला ता.२५-: वेंगुर्ला तालुक्यातीलवायंगणी गावातील निराधार नागरिकांसाठी दिलासा देणारा मोठा निर्णय वायंगणी ग्रामपंचायतीने घेतला आहे. शुक्रवारी सरपंच दत्ताराम उर्फ अवी दुतोंडकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मासिक सभेत एकमताने हा ठराव मंजूर करण्यात आला.वायंगणी गावातील निराधार नागरिकांसाठी घरपट्टी पूर्णतः माफ तसेच स्मशानभूमी शुल्क माफ करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे.या…

Read More
You cannot copy content of this page