Global Maharashtra Breaking News

आंबा काजू बागायतदार यांचे नुकसान ही नैसर्गिक आपत्ती घोषित करा…

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिल्ली येथे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सदस्य श्री. कृष्ण वत्स यांचेकडे केली… ⚡देवगड ता.११-:राज्यांमधील आंबा आणि काजू बागांचे अतोनात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकार आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (NDMA) या संकटाला ‘नैसर्गिक आपत्ती’ घोषित करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिल्ली येथे…

Read More

फोंडाघाट हवेलीनगर येथील मयुरेश धाक्रस यांचे निधन…

⚡कणकवली ता.११-: फोंडाघाट हवेलीनगर येथील मयुरेश दिलीप धाक्रस (वय ३७) यांचे मंगळवारी सकाळी पुणे येथील राहत्या घरी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांचे शालेय शिक्षण करुळ हायस्कूल येथे झाले असून पुढील शिक्षण त्यांनी रत्नागिरी आणि पुणे येथे पूर्ण केले होते. त्यांच्या अकाली निधनाची बातमी समजताच मित्रपरिवार व नातेवाईकांनी बुधवारी सकाळी फोंडाघाट येथील त्यांच्या राहत्या…

Read More

तेजस खटावकर यांच्या निधनाने विशाल परब यांच्याकडून शोक व्यक्त…

⚡सावंतवाडी ता.११-: जिल्हाभर आपल्या अनोख्या शैलीत चालत फिरणारा म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या तेजस खटावकर यांच्या अकाली निधनाने भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी दुःख व्यक्त केले आहे. यावेळी त्यांनी त्याला श्रद्धांजली अर्पण केली.

Read More

प्रा. प्रवीण दवणे यांना यंदाचा आरती प्रभू पुरस्कार प्रदान…

कुडाळ मध्ये पुरस्कार वितरण सोहळा:ज्येष्ठ अभिनेता प्रसाद पंडित यांच्या हस्ते पुरस्कार वितरण.. कुडाळ : प्रतिभावान लेखक चिं त्र्यं खानोलकर तथा आरती प्रभू या महान साहित्यिकांच्या नावाने नावाने दिला जाणारा हा पुरस्कार मिळतोय याचा मला निश्तितच आनंद आहे. बाबा वर्दम थिएटर्स आणि आरती प्रभू कला अकादमी यांच्या या उपक्रमाचे कौतुक करत असताना मराठी भाषा संवर्धनाची सुद्धा…

Read More

आकेरीचा तेजस खटावकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन..

चालत फिरण्याच्या अनोख्या शैलीमुळे जिल्ह्यात ओळख: अनेक बड्या नेत्यांशी जिव्हाळ्याचे नाते.. सावंतवाडी:​जिल्हाभर आपल्या अनोख्या शैलीत चालत फिरणारे आणि पोलीस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्यासह अनेक बड्या नेत्यांशी जिव्हाळ्याचे नाते जपणारे आकेरी येथील तेजस खटावकर यांचे आज पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाने आकेरी परिसरासह संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.​तेजस…

Read More

कणकवली बसस्थानकामध्ये स्मार्ट कार्ड सेवेचा शुभारंभ…

⚡कणकवली ता.११-: एसटी महामंडळाने प्रवाशांसाठी ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे विविध सामाजिक सवलतींचा लाभ मिळवण्यासाठी हे ‘स्मार्ट कार्ड’ अनिवार्य असणार आहे. मंगळवारी कणकवली बसस्थानकामध्ये या स्मार्ट कार्ड काढण्याच्या सेवेचा शुभारंभ करण्यात आला. एसटीच्या कारभारात पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि सवलतींची अचूक नोंद ठेवण्यासाठी महामंडळाने ईबिक्स टेक्नोलॉजिस लिमिटेड आणि एनएसडीएल पेमेंट्स बैंक…

Read More

दांडी येथे जाळ्यात अडकलेल्या घारीला जीवदान…

⚡मालवण ता.११-:दांडी येथील दांडेश्वर मंदीर नजीक जाळ्यात अडकलेल्या व उष्णतेमुळे निर्जलीकरण झालेल्या घार (ब्लॅक काईट) पक्षास मच्छिमार व पर्यटन व्यावसायिकांनी जीवदान दिले. दांडी येथील दांडेश्वर मंदिरनजीकच्या समुद्र किनाऱ्यालगत जाळ्यात अडकलेला व उष्णतेमुळे निर्जलीकरण अवस्थेत घार हा पक्षी प्रविण कुबल यांच्या निदर्शनास आला. त्यानंतर पारंपरिक मच्छिमार, पर्यटन व्यवसायीक प्रविण कुबल, रामा धुरत व वरद मोरजकर यांनी…

Read More

ज्येष्ठ नागरिक संघ सावंतवाडी कडून सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या रुग्णवाहिकेसाठी 51 हजार 500 रुपयाची देणगी…

⚡सावंतवाडी ता.११-: सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या सेवाभावी कार्याचे कौतुक करून रुग्णांच्या सेवेसाठी घेण्यात येणाऱ्या रुग्णवाहिकेसाठी अण्णा देसाई प्राध्यापक सुभाष गोवेकर व संस्थेचे सचिव प्रकाश राऊळ यांच्या पुढाकारातून ज्येष्ठ नागरिक संघ सावंतवाडी यांच्याकडून रोख रक्कम 51 हजार 500 रुपये एवढी देणगी देण्यात आली.सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान जिल्हास्तरावर करत असलेले सेवाभावी कार्य अतिशय उत्कृष्ट आहे याचा अनुभव आम्ही नेहमी…

Read More

देवगड सागरी हद्दीत कर्नाटकच्या ट्रॉलिंग नौकेवर धडक कारवाई नौका जप्त…

आठ खलाशी ताब्यात, जप्त मासळीचा लिलाव सुरू.. देवगड / प्रतिनिधी :महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत परप्रांतीय नौकांकडून होणाऱ्या अवैध मासेमारीला आळा घालण्यासाठी मत्स्यव्यवसाय विभागाने धडक कारवाई करत कर्नाटक राज्यातील एका ट्रॉलिंग नौकेला जप्त केले आहे. या कारवाईत नौकेवरील तांडेलसह आठ खलाशांना ताब्यात घेण्यात आले असून जप्त करण्यात आलेल्या मासळीचा लिलाव सुरू करण्यात आला आहे.मत्स्यव्यवसाय विभागाच्या गस्ती पथकाने…

Read More

आंबा बागायतदारांच्या आक्रोश मोर्चाला मराठा समाज देवगडचा जाहीर पाठिंबा. .

⚡देवगड ता.११-:हवामानातील प्रतिकूल परिस्थिती, विविध किडी-रोगांचा प्रादुर्भाव, बाजारातील शेतमालाच्या दरातील घसरण व अनिश्चितता तसेच वाढलेला उत्पादन खर्च या पार्श्वभूमीवर आंबा बागायतदार शेतकरी मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जात आहेत. या समस्यांकडे शासनाने तात्काळ लक्ष देऊन शेतकऱ्यांना न्याय मिळावा या मागणीसाठी आयोजित करण्यात आलेल्या आक्रोश मोर्चाला मराठा समाज, देवगड यांच्याकडून जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे.याबाबत देवगड तालुका…

Read More
You cannot copy content of this page