Headlines

Global Maharashtra Breaking News

सोनू सावंत कुटुंबियांचे शिवसेना युवानेते संदेश पारकर यांनी केले सांत्वन

⚡कणकवली ता.१२-: वरवडे येथील रहिवासी कणकवली भाजपचे उपतालुकाध्यक्ष सोनू सावंत यांचे बंधू मनोज सावंत यांचे अपघाती निधन झाल्याने त्यांच्या निवासस्थानी जाऊन शिवसेना युवानेते संदेश पारकर यांनी त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले.यावेळी युवासेना माजी जिल्हाप्रमुख अँड.हर्षद गावडे, कणकवली युवासेना सरचिटणीस धनंजय सावंत, वरवडे शाखाप्रमुख फ्रँकी लोबो, सुधिर सावंत आदी उपस्थित होते.

Read More

लाडाची बाग येथे बंद घरात सापडला महिलेचा मृतदेह

पोलीस घटनास्थळी दाखल ⚡सावंतवाडी ता.१२-: येथील लाडाची बाग येथे एका बंद घरात महिलेचा मृतदेह सापडला असून, घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

Read More

मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा

⚡सिंधुदुर्गनगरी ता.१२-: अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून दि. 12 ऑगस्ट ते 14 ऑस्ट रोजी राज्याच्या किनारपट्टीवर ताशी 45 ते 60 कि.मी. प्रती तास वेगाने वारे वाहणार आहेत. तसेच दि. 12 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट या कालावधीत समुद्र खबळलेला राहणार असल्याने या कालावधीत मच्छिमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये असा इशारा देण्यात आल्याचे जिल्हाधिकारी…

Read More

मळगाव घाटीतील धोकादायक झाडे तात्काळ तोडा, अन्यथा आंदोलन : गुणाजी गावडे

⚡सावंतवाडी ता.१२-: सार्वजनिक बांधकाम विभाग आणि वनविभाग यांच्यात एकमत नसल्यामुळे मळगाव घाटीतील धोकादायक झाडांचा प्रश्न जैसे थे आहे, काल झालेला प्रकार लक्षात घेता धोकादायक झाडे तोडा अन्यथा दुदैवाने एखादा अपघात घडल्यास त्यांला दोन्ही विभागाचे अधिकारी जबाबदार राहतील , असा इशारा वेत्ये उपसरपंच तथा युवा सेनेचे पदाधिकारी गुणाजी गावडे यांनी दिला आहे. काल रात्री झालेल्या वादळी…

Read More

मळगाव येथील हरिनाम सप्ताहाची महाप्रसादाने उत्साहात सांगता

मळगाव येथील स्थानिक भजन मंडळांची ठरवून दिलेल्या पाराप्रमाणे भजने सादर ⚡सावंतवाडी ता.१२सहदेव राऊळ-: मळगाव येथील पंचायतन श्री देव रवळनाथाचा सातपाराचा वार्षिक हरिनाम सप्ताह भाविकांच्या गर्दीत व मानकऱ्यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. मळगाव येथील स्थानिक भजन मंडळांनी ठरवून दिलेल्या पाराप्रमाणे आपली भजने सादर केली. या दोन दिवसीय हरिनाम सप्ताहाची आज महाप्रसादाने सांगता करण्यात आली. मळगावातील भाविकांनी…

Read More

आंबोलीत सध्या सुरू असलेला विजेचा खेळखंडोबा सुधारा

संतप्त आंबोली ग्रामस्थांची मागणी आंबोली : सद्या सगळीकडे वीज वीज वितरणच्या भोंगळ कारभार सुरु असल्याचे चित्र असून वितरण कंपनी आपल्या सुस्त व्यवहारातच धन्यता मानते आहे.सावंतवाडी तालुक्यातील वर्षा पर्यटनासाठी जगप्रसिद्ध असलेल्या असून आंबोलीत सद्या फक्त दोन वायरमन कार्यरत आहेत. मागील आठ दिवस प्रचंड पाऊस आणि वादळ वारा असल्यामुळे विजेचा खेळखंडोबा सुरु असून वीज गायब आहे. त्यामुळे…

Read More

देवगड पंचायत समितीच्या वतीने जनजागृती रॅली

देवगडस्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त देवगड पंचायत समितीच्या वतीने जनजागृती प्रभात फेरी देवगड पंचायत समिती कार्यालय ते आठवडा बाजार जुने पोलीस स्टेशन मार्गे पवनचक्की या मार्गापर्यंत करण्यात आली.या प्रभात फेरीत प.स.चित्ररथ तसेच गटविकास अधिकारी ,कक्ष अधिकारी,अन्य विभाग प्रमुख अधिकारी कर्मचारी सहभागी होऊन देवगड पवनचक्की येथील मोकळ्या मैदानात ७५ वा अमृतमहोत्सव साकारण्यात आला.

Read More

रविवारी रानभाज्या विक्री व खाद्य महोत्सव

शासन विभागांचे संयुक्त आयोजन देवगडदेवगड स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त कृषी विभाग , कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन (आत्मा) पंचायत समिती देवगड, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान देवगड (उमेद) आणि नगरपंचायत देवगड जामसंडे यांच्या संयुक्त विद्यमाने देवगड तालुक्यात रानभाज्या विक्री व खाद्य महोत्सव रविवार दिनांक १४ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत कै मो .ज….

Read More

कणकवली शहरातील ज्येष्ठ नागरिक व माजी सैनिकांचा नगरपंचायतीने केला सत्कार

⚡कणकवली ता.१२-: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त कणकवली नगरपंचायतच्यावतीने विविध उपक्रम राबविण्यात येत असताना कणकवली शहरातील ज्येष्ठ नागरिक व माजी सैनिकांचा सत्कार नगराध्यक्ष समीर नलावडे उपनगराध्यक्ष बंडू हर्णे व मुख्याधिकारी अवधूत तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने कणकवली नगरपंचायतच्या वतीने विविध उपक्रम यानिमित्ताने राबविण्यात येत आहेत. कणकवली शहराच्या वाटचालीत योगदान देणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचा…

Read More

महाराणी ताराराणी यांच्या सिंधुदुर्ग किल्ल्यातील वास्तव्यामागील सत्य समजून घ्यावे – ज्योती तोरसकर

⚡मालवण ता.१२-: मालवणच्या सिंधुदुर्ग किल्ल्यातील राणीची वेळ या ठिकाणी महाराणी ताराबाई या विश्रांती साठी आल्या होत्या, असे मत प्रचलित आहे. परंतु महाराष्ट्रात अराजकाची परिस्थिती असताना वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी ताराबाईंनी स्वराज्याची धुरा आपल्या हातात घेतली आणि मुघलांचा प्रतिकार करण्यासाठी मोठा संघर्ष केला. त्यातील रांगणा किल्ल्यावर वेढा पडल्यावर महाराणी सिंधुदुर्ग किल्ल्यावर वास्तव्यास आल्या आणि इथून…

Read More
You cannot copy content of this page