जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत आचिर्णे विद्यालयाची श्रेया शेळके प्रथम
⚡वैभववाडी ता.१८ संजय शेळके-: स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत आचिर्णे विद्यालयाची कु. श्रेया संदीप शेळके हिने प्रथम क्रमांक पटकावला आहे. तिने मिळविलेल्या यशाबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे. भारतभर अगदी उत्साहाने व आनंदाने महोत्सव साजरा करण्यात आला. या अनुषंगाने देशभर विविध स्पर्धांचे व उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. याचाच एक…
