Global Maharashtra Breaking News

बांदा–सटमटवाडी कालव्यांची दयनीय अवस्था…

दुरुस्ती न झाल्यास आंदोलन: रियाज खान व विजय बांदेकर यांचा इशारा. ⚡बांदा ता.३०-: बांदा–सटमटवाडी तसेच वाफोली गावातून जाणाऱ्या कालव्यांची अवस्था सध्या अत्यंत बिकट झाली असून शेतकऱ्यांच्या पाण्याच्या हक्कावरच गदा येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. कालव्यांच्या दोन्ही बाजूंना झाडी-झुडपांनी अक्षरशः अतिक्रमण केल्याने पाण्याचा प्रवाह अडथळित होत आहे. अनेक ठिकाणी कालव्यांना मोठ्या भेगा पडल्या असून काही भाग…

Read More

“जीवाची मुंबय” उपक्रमातून गरजू महिलांना मुंबई दर्शनाची संधी..

⚡बांदा ता.३०-: कोकणातील अनेक महिलांचे “मुंबई पाहण्याचे” स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी एक आगळावेगळा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. श्री दयानंद कुबल यांच्या संकल्पनेतून आनंद फाउंडेशन, मुंबई व कोकण संस्था, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने बांदा विभागातील गरजू महिलांसाठी “जीवाची मुंबय” ही विनामूल्य सहल आयोजित करण्यात आली आहे.या उपक्रमांतर्गत निवड झालेल्या महिलांना मुंबईतील विविध प्रमुख ठिकाणांचे दर्शन घडविण्यात…

Read More

दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयातील आरोग्यव्यवस्थेचा बोजवारा उघड…

कृती समितीच्या पाहणीत धक्कादायक वास्तव समोर. ⚡दोडामार्ग ता.३०-:सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू असलेल्या जनता आरोग्य दरबारच्या पार्श्वभूमीवर दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य व्यवस्थेचे वास्तव उघडकीस आले असून, सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या प्रत्यक्ष भेटीत गंभीर त्रुटींचा भडिमारच समोर आला आहे. रुग्णालयातील परिस्थिती पाहता आरोग्य यंत्रणेचा पूर्णपणे बोजवारा उडाल्याचे स्पष्ट झाले असून, रुग्णांना मूलभूत सुविधा मिळण्यातही मोठा…

Read More

वेंगुर्ले येथे १ मे रोजी “संगीत कुर्माख्यान”…

महाराष्ट्र दिन ,कामगार दिन आणि कूर्म जयंती निमित्त विशेष प्रयोग:समुद्री कासव संवर्धनावर आधारित विनोदी वन्यजीव नाटक :- प्रवेश विनामूल्य.. ⚡वेंगुर्ले ता.३०-: येथे शुक्रवार दिनांक १ मे रोजी कांदळवन विभाग दक्षिण कोकण, वनपरिक्षेत्र कांदळवन मालवण आणि नगरपरिषद वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमानाने वन्यवाणी फाऊडेंशन निर्मित समुद्री कासव संवर्धनावर आधारित लोककलांच्या माध्यमातून रचलेले पहिले विनोदी वन्यजीव नाटक “संगीत…

Read More

माजगावच्या नवनिर्वाचित सरपंच रंजना कानसे यांनी घेतली संजू परब यांची सदिच्छा भेट…

⚡सावंतवाडी ता.३०-: माजगाव ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सरपंच सौ. रंजना रविंद्र कानसे यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी संजू परब यांनी सरपंच कानसे यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.या प्रसंगी रवींद्र कानसे तसेच सौ. संजना परब उपस्थित होते.

Read More

वेंगुर्ला शहरात अमली पदार्थ मुळे विद्यार्थ्यांचे जीवन धोक्यात : नगरसेवक प्रीतम सावंत…

⚡वेंगुर्ला ता.२९-: वेंगुर्ला शहरात अमली पदार्थांचा प्रादुर्भाव वाढलाअसून विद्यार्थ्यांचे जीवन धोक्यात आले आहे. वेंगुर्ला शहरात कंपोस्ट डेपो नजिक एरियात, कॅम्प बीएसएनएल ऑफिस पाठीमागील एरियात, निमुसगा नजिक एरियात, धावडेश्वर नजिक एरियात वगैरेशहरात एकूण सात ते आठ स्पॉट निर्माण झाले आहेत. अगदी आठवी इयत्तेपासूनची मुले, कॉलेज विद्यार्थी शहरात सायंकाळी अमली पदार्थांचा वापर करतात, गांजा ओढतात, ही बाब…

Read More

गावनिहाय आपत्ती व्यवस्थापन आराखडे त्वरित बनवा…

शारदा पवार:आपत्तीत फोन रिसिव्ह न केल्यास घरी बसावे लागेल.. ⚡वेंगुर्ला ता.२९-: जळगाव, धुळे आदी व अन्य ठिकाणी 48 ते 50 अंश सेलस्सीअस तापमान असते. कोकणात आज रोजी 41 अंश सेलसिअस तापमान आहे. ग्लोबल वोरमिंग परिस्थिती व हवामानाचा अंदाज पाहता कोकणात पावसाचे आगमन लवकर होऊ शकते. यासाठी सर्वांनी अलर्ट होऊन काम करणे आवश्यक आहे. त्यामुळे तालुक्यातील…

Read More

कुडाळमध्ये बसमध्ये चढताना महिलेचे पर्समधील दागिने चोरीस..

अडीज लाखाचे दागीने अज्ञात चोरट्याने लांबवले. कुडाळ : एसटी बसमध्ये चढणाऱ्या एका प्रवाशी महिलेच्या पर्स मधील सोन्याचे दागिने असलेले पाऊच अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना बुधवारी दुपारी पावणेतीन वाजण्याच्या सुमारास कुडाळ बसस्थानकात घडली. यात जवळपास सात तोळ्यांचे सुमारे २ लाख ५५ हजार रूपये किंमतीचे दागिने चोरीस गेल्याची तक्रार सौ.सुप्रिया सचिन पेंडूरकर (वय 39, सध्या रा.अंधेरी…

Read More

रामेश्वर वाचन मंदिर तर्फे ८मे रोजी नाट्यवाचन कार्यक्रम…

⚡मालवण ता.२९-:श्री रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर, आचरा तर्फे शुक्रवार ८ मे रोजी दुपारी ठीक ३. ३० वाजता संस्थेचे माजी अध्यक्ष कै. श्रीकांत रघुनाथ सांबारी यांच्या तृतीय स्मृतिदिनानिमित्त नमन नटवरा ‘ अर्थात ‘नाट्योत्सव ‘* हा वाचकांच्या आवडत्या नाटकातील कोणत्याही प्रवेशाचे वाचन कार्यक्रम आयोजित केला आहे. यासाठी वेळ तीन ते पाच मिनिटे असून ज्या नाट्यरसिकांना या वाचनात…

Read More

वराडमधून वर्षा मिठबावकर, धामापूरमधून आसावरी भोसले विजयी…

⚡मालवण ता.२९-:मालवण तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून वराड आणि धामापूर ग्रामपंचायतीच्या प्रत्येकी एका सदस्य पदासाठी झालेल्या अटीतटीच्या निवडणुकीत वराड ग्रामपंचायतीमधून वर्षा प्रदीप मीठबावकर यांनी तर धामापूर ग्रामपंचायतीमधून आसावरी भोसले या विजयी ठरल्या. मालवण येथील तहसील कार्यालयात आज सकाळी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची प्रक्रिया पार पडली. चौके ग्रामपंचायत सरपंच म्हणून शिवप्रसाद चौकेकर यांनी विजय संपादन केला….

Read More
You cannot copy content of this page