सावंतवाडी तालुक्यात गेले तीन दिवस धो धो कोसळणाऱ्या पावसामुळे जनजीवन विस्कळी…
शेतकऱ्यांचे मोठे नुकसान:अनेक ठिकाणी झाडे कोसळली ⚡सावंतवाडी ता.२०-: तालुक्यात गेले तीन दिवस धो धो कोसळणाऱ्या पावसामुळे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे. नदी-नाले, ओढे यांना पूर आल्यामुळे अनेकांनी घरातच थांबणे पसंत केले आहे. पूरस्थिती निर्माण झाल्याने भात शेती पूर्णतः पाण्याखाली गेली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे कोसळली…
