धाकोरे गावातील अतिक्रमण झालेला तो रस्ता अखेर ‘खुला ‘…
स्थानिकांनी मानले पालकमंत्र्यांचे विशेष आभार.. ⚡सावंतवाडी ता.१८-: सावंतवाडी तालुक्यातील धाकोरे गावातील ग्रामस्थांनी ३५ वर्षांपासून सुरू असलेल्या संघर्षाला अखेर पूर्णविराम दिला आहे. पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या विशेष पाठपुराव्यामुळे आणि प्रशासनाच्या समन्वित प्रयत्नांमुळे, गावातील सरकारी अधिकृत रस्ता अखेर अतिक्रमणमुक्त झाला. हा ऐतिहासिक विजय धाकोरे आणि बांदिवडेवाडी येथील ग्रामस्थांच्या एकजुटीचा आणि त्यांच्या न्याय हक्काच्या लढ्याचा प्रतीक बनला…
