कवी गोविंद काजरेकर यांच्या सुन्नतेचे सर्ग काव्यसंग्रहाला दुसरा पुरस्कार
बांदा/प्रतिनिधीगोविंद काजरेकर यांच्या ‘सुन्नतेचे सर्ग’ या दुसऱ्या कवितासंग्रहाला दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा कोल्हापूरचा धम्मपाल रत्नाकर हा राज्यस्तरीय पुरस्कार शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. गोविंद काजरेकर हे महाराष्ट्रातील एक नामवंत कवी आणि समीक्षक असून त्यांचे या आधी ‘उरल्या सुरल्या जगण्याचे रिमिक्स’ हा कवितासंग्रह तर ‘राजन गवस यांचे कथात्म साहित्य’,…
