वागदे येथील अपघातात पादचारी जखमी…

⚡कणकवली ता.१९-: मुंबई-गोवा महामार्गावरून चालणाऱ्या कानोजी रुकमाजी गुराम (55 रा. वागदे-सावरवाडी) यांना गोव्याहून कणकवलीच्या दिशेने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने धडक दिली. या धडकेत कानोजी हे जखमी झाले आहेत. हा अपघात शुक्रवारी सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास वागदे ग्रामपंचायत कार्यालय परिसरात घडला. गुराम यांच्या फिर्यादीवरून अज्ञात दुचाकीस्वारावर कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. गुराम हे मुंबई गोवा-महामार्ग…

Read More

अणसूर येथे ५५ जणांची आरोग्य तपासणी…

⚡वेंगुर्ला ता.१९-: माधवबाग कुडाळ आणि श्री देव काळोबा प्रासादिक मंडळ अणसूर यांच्या संयुक्त विद्यमाने अणसुर ग्रामपंचायत येथे आरोग्य शिबिर संपन्न झाले. या शिबिराचा सुमारे ५५ रुग्णांनी लाभ घेतला. हे शिबिर यशस्वी होण्यासाठी सरपंच सत्यविजय गावडे यांनी विशेष मेहनत घेतली. फोटोओळी – अणसूर येथील आरोग्य शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी सरपंच सत्यविजय गावडे व इतर मान्यवर उपस्थित होते.

Read More

विविध स्पर्धेत राणी लक्ष्मीबाई कन्याशाळेचे यश…

⚡वेंगुर्ला ता.१९-: वेंगुर्ला येथील राणी लक्ष्मीबाई कन्याशाळेच्या विद्यार्थ्यांनी सन २०२३-२३ मध्ये झालेल्या विविध स्पर्धा परिक्षांमध्ये बाजी मारली आहे. सिधुदुर्ग जिल्हा परिषदतर्फे इयत्ता चौथीसाठी आयोजित एपीजे अब्दुल कलाम शिष्यवृत्ती परीक्षेत या शाळेतून बसलेले सर्वही विद्यार्थी उत्तीर्ण होऊन निकाल १०० टक्के लागला. यात यशिका पांडुरंग माडये ही वेंगुर्ला तालुक्यात पाचवी आली.

Read More

भिरवंडेत वादळी वाऱ्यामुळे झाड पडून घराचे नुकसान…

⚡कणकवली ता.१९-: भिरवंडे गावामध्ये गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास जोरदार वादळीवाऱ्यांचा तडका बसला.अचानक जोरदार वादळ वारे वाहू लागल्याने त्यात आमनीपाचेवाडी येथील पंढरीनाथ सिताराम परब यांच्या घरावर आंब्याचे झाड कोसळले. त्यामुळे परब यांच्या घराचे नुकसान झाले आहे. गेले काही दिवस उष्णतेचा पारा वाढलेला असतानाच अचानक गुरुवारी मध्यरात्री वादळी वारे सुरू झाले. त्यातच विद्युत पुरवठा ही खंडित झाला होता….

Read More

आपल्या हक्काचा सन्मान,करायलाच हवे मतदान…

बांदा येथे विद्यार्थ्यांकडून मतदान जनजागृती.. ⚡बांदा ता.१९-: लक्षात ठेवा, लक्षात ठेवा ७मे मतदानाचा दिवस लक्षात ठेवा. आपल्या हक्काचा सन्मान करायलाच हवे मतदान .मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो .आपले मत ,आपला हक्क, मतदानासाठी वेळ काढा ,आपली जबाबदारी पार पाडा. अशा प्रकारच्या मतदान जनजागृती विषयी घोषणा देत पी एम श्री जिल्हा परिषद बांदा केंद्रशाळेतील स्काऊट…

Read More

मालवण शहरात विनायक राऊत यांच्या प्रचाराचा शुभारंभ…

⚡मालवण ता.१९-: रत्नागिरी- सिंधुदुर्ग मतदार संघाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे व इंडीया आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या मालवण शहरातील प्रचाराचा शुभारंभ मालवण देऊळवाडा येथील ग्रामदैवत श्री रामेश्वर मंदिर येथे करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी श्री देव रामेश्वर चरणी विनायक राऊत यांचा मोठ्या मताधिक्याने विजय व्हावा, असे गाऱ्हाणे घालत शहरातील प्रचारास सुरुवात केली. यावेळी ठाकरे शिवसेनेचे…

Read More

अवैध दारू वाहतूक प्रकरणी ओरोस येथे दोघे ताब्यात…

राज्य उत्पादन शुल्कची कारवाई; ४९ लाख ५५ हजाराचा मुद्देमाल जप्त… बांदा,ता.१९: राज्य उत्पादन शुल्कच्या कोल्हापूर भरारी पथकाने ओरोस- कुडाळ येथे टेम्पोतून होणाऱ्या अवैध दारू वाहतुकीवर कारवाई करत ४९ लाख ५५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

Read More

गडनदीतील गाळ काढणार…

परितोष कंकाळ यांची माहिती… ⚡कणकवली ता.१९-: शिवडाव धरणातील पाणी सोडण्यासाठी मागणीपत्र देणारकणकवली : नगरपंचायतीची नळ योजना गड नदी पात्रातील पाण्यावर कार्यान्वित आहे. मात्र दरवर्षी मे अखेरीस नदी पात्रातील पाणी कमी होत असल्याने नागरिकांना पाणी टंचाईचा त्रास सहन करावा लागतो. त्यापार्श्वभूमीवर कणकवली नगरपंचायतीने मे महिन्यामध्ये नदीतील गाळ उपसा करण्याचे नियोजित केले आहे. सुमारे आठ ते दहा…

Read More

विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्चित करावे…

अशोक नर यांचे आवाहन ः नांदगाव येथे बक्षीस वितरण सोहळा.. ⚡कणकवली ता.१९-: गुणवंत विद्यार्थ्यांचा आपण सन्मान करतो हे त्याच्यासाठी व आईवडीलांसाठी खुप महत्वाचे आहे. ज्यांना ज्यांना बक्षीस मिळाले आहे त्यांचे घरी कौतुक होणार आहे. जीवनात स्पर्धा आहे. स्पर्धेशिवाय पर्याय नाही. शिक्षक विद्यार्थी घडवत असाताना देशाचा नागरीक घडवत असतात. शिक्षण घेत असताना मुलांनी ध्येय निश्चित केले…

Read More

क्षमता नसल्याने विनायक राऊत यांची गटनेते पदावर बोळवण…

मंत्री दीपक केसरकर यांची टिका:किरण सामंत यांचा शिवसेना मानसन्मान राखणार असल्याचे केले सूतोवाच.. सावंतवाडी ता.१८-: विनायक राऊत दहा वर्ष खासदार होते. उद्धव ठाकरे यांच्या अगदी जवळचे होते. परंतु ते साधे राज्यमंत्री सुद्धा होऊ शकले नाहीत. कारण त्यांची काम करण्याची क्षमता नव्हती. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी त्यांना गटनेते सारखे पद दिले, असा टोला मंत्री दीपक केसरकर…

Read More
You cannot copy content of this page