Headlines

अखेर आंबा विक्रेत्यांना पालिका प्रशासनाने हटविले…

कुठलीही मुदतवाढ नाही ; आंबा विक्रेत्यात नाराजी; भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी दिलेला आश्वासन हवेतच…

सावंतवाडी
येथील बाजारपेठेत आंबा विक्रीस बसणाऱ्या व्यापाऱ्यांची दुकाने अखेर पालिका प्रशासनाने हटविण्यास सुरवात केली आहे, काल त्यांना याबाबत सुचना केली होती, त्यांना पुनश्च कुठलीही मुदतवाढ देण्यात आली नव्हती. त्यामुळे आज सकाळ पासून ही दुकाने हटविण्यात आल्याने व्यापाऱ्यांना कोणीच वाली नसल्याचे समोर आले आहे.


सावंतवाडी बाजारपेठेत आंबा विक्री बसणाऱ्या विक्रेत्यांना एक जून पर्यंत रस्त्यावर आंबा विक्री करण्यास पालिका प्रशासनाने मदत दिली होती ही मुदत संपल्यानंतर त्यांना रस्त्यावरील दुकाने हटवण्यास पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले होते परंतु अजूनही काही मुदत द्या असे सांगितल्यानंतर त्यांना ही मुदत वाढवून देण्यात आले होते त्यानंतर काल मुदत संपल्यानंतर सदरची दुकाने हटवण्याची सूचना पालिका प्रशासनाकडून करण्यात आल्या होत्या या सूचनेनंतर आंबा विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली होती. चार दिवसांपूर्वी भाजपाचे युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब तसेच माजी नगरसेवक सुधीर आडीवरेकर व अन्य पदाधिकाऱ्यांनी मुख्याधिकाऱ्यांची भेट घेत वटपौर्णिमेपर्यंत आंबा विक्रेत्यांना बसण्यास मुबा द्या अशी मागणी केली होती मात्र असे असतानाही प्रशासनाने आज आंबा विक्रेत्यांना हटविण्याची कारवाई केल्याने आंबा विक्रेत्यांना कोणीच वाली नसल्याचे दिसून आले.
याबाबत पालिका प्रशासनाला विचारले असता आंबा विक्रेत्यांना काल कुठलीच मुदत वाढ देण्यात आली नव्हती. मुळातच त्यांना कालपर्यंत मुदत वाढवून दिली होती त्यामुळे ही कारवाई हाती घेतली असे सांगितले.

You cannot copy content of this page