राजन तेली : आरडाओरोड करून पार्टी केव्हा तिकीट देत नाही ; संजू परबांना टोला
⚡सावंतवाडी ता.०८-: मागच्या पालकमंत्र्यांनी युतीमध्ये आम्ही असताना आमच्या विकास कामाची पत्र देऊन सुद्धा आम्हाला निधी दिला नाही. त्यामुळे गेल्या दीड वर्षात पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी भरघोस निधी दिल्याने सर्वसामान्य जनतेचे काम करू शकलो. त्यामुळे जनतेने आम्हाला भरभरून मतदान केलं अशी प्रतिक्रिया माजी आमदार राजन तेली यांनी येथे दिली.
दरम्यान भाजपा सर्वसामान्यांचा पक्ष आहे. त्यामुळे पक्षाकडे कोणीही तिकीट मागू शकत. परंतु, आरडा ओरड करून पक्ष केव्हाही तिकीट देत नाही असा टोला देखील त्यांनी यावेळी नाव न घेता संजू परब यांना लगावला. ते सावंतवाडी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
