अर्चना घारे: स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत शरद पवार यांची भेट घेत केली मागणी..
⚡सावंतवाडी ता.२३-:.शिरोडा वेळागर येथील पर्यटन विकास प्रकल्पासाठी ज्या शेतकऱ्यांची अधिकची जमीन अधिग्रहित होत आहे अशा शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मार्ग काढा अशी मागणी राष्ट्रवादीच्या कोकण विभागीय महीला अध्यक्ष अर्चना घारे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याजवळ केली.
वेळागर येथील प्रश्नावर सौ.घारे यांनी आज मुंबईत श्री पवार यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या चर्चेत
वेळागर येथील स्थानिक नागरिकांचा पर्यटन विकास प्रकल्पास विरोध नाही, मात्र अधिग्रहित होत असलेल्या अधिकच्या जमिनीतून शेतीवर उदरनिर्वाह अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांची जमीन वगळण्यात यावी, तसेच गावठाण क्षेत्र वगळण्यात यावे अशी त्यांची मागणी असल्याचे सांगितले. दरम्यान स्थानिक शेतकऱ्यांची सदर मागणी अतिशय रास्त असून याबाबतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत लवकरच बैठक आयोजित करून निश्चितच तोडगा काढण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन श्री पवार दिले. यावेळी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील विविध विषयांबाबत त्यांनी पवार यांचे लक्ष वेधले.
यावेळी माजी सभापती जयप्रकाश चमणकर, शेतकरी संघटना अध्यक्ष राजू आंदुर्लेकर, सचिव हनुमंत गवंडी, सल्लागार भाऊ आंदुर्लेकर, गजानन गवंडी, शेखर नाईक, संजय आरोसकर, तातू आंदुर्लेकर, प्रकाश गवंडी, महेश आंदुर्लेकर आणि चंद्रकांत नाईक उपस्थित होते.
