ते 40 आमदार आजही मनापासून शरद पवार यांच्यासोबतच

जितेंद्र आव्हाड; ईडीच्या भेटीने भाजपने पळवले

बांदा/प्रतिनिधी
राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत ४० आमदार हे आजही मनापासून आहेत. त्यांना केवळ ईडीच्या भीतीने भाजपने पळविले आहे. आता रस्त्यावर उतरलो आहोत त्यामुळे लढणार तर नक्कीच असे विधान करत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी बोलून लवकरच पुढील रणनीती ठरविणार असल्याचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी बांद्यात पत्रकारांशी बोलताना सांगितले.
प्रदेशाध्यक्ष आव्हाड यांचे बांद्यात राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी जंगी स्वागत केले.

You cannot copy content of this page