१०० वर्षे बाजार टिकेल याची हमी द्याल का ?;ठाकरे गटाच्या रुपेश राऊळ यांची टीका
⚡सावंतवाडी ता.०९-: आठवडा बाजाराची जागा दुसरीकडे हलवली गेली हा केसरकरांचा छुपा दहशतवादच आहे. मात्र जागा बदलली तरी चालेल परंतु त्या जागेवर 100 वर्ष बाजार चालेल अशी योग्य असणे गरजेचे आहे. आज ज्या ठिकाणी बाजार नेला त्या ठिकाणी वर्षानुवर्षं बाजार टिकेल याची खात्री केसरकर देणार का? असेही रुपेश राऊळ म्हणाले.ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
