⚡मालवण ता.०५-: मालवण वायरी भूतनाथ येथील श्री रेकोबा माध्यमिक विद्यालयाच्या २००३-०४ सालच्या इयत्ता १० वी च्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन प्रशालेच्या श्रीमती विजयाताई गावकर सभागृहामध्ये उत्साहात पार पडले. शालेय जीवनानंतर १९ वर्षांनी प्रथमच पुन्हा एकत्र जमलेल्या या माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय आठवणीना उजाळा देत त्यात रमून गेले.
यावेळी रेकोबा विद्यालयाचे मुख्याध्यापक सुहास हिंदळेकर यांच्यासह शिक्षक रामचंद्र गोसावी, प्रवीण कुबल, संभाजी कोरे, यशवन्त गावकर, दत्तात्रय गोसावी आदी उपस्थित होते. शाळेच्या विकासासाठी माजी विद्यार्थी ही मोठी शक्ती असते, त्यामुळे शाळेला गतवैभव प्राप्त करण्यासाठी आणि शाळेच्या भौतिक विकासासाठी शाळेच्या सर्व माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन शाळेला मदत करण्याचे आवाहन यानिमित्ताने मुख्याध्यापक सुहास हिंदळेकर यांनी केले.
यावेळी माजी विद्यार्थ्यांकडून रेकोबा शाळेला वस्तू स्वरूपात भेटवस्तू देण्यात आल्या. यावेळी मंदार आजगावकर, केतन आजगावकर, प्रभूदास आजगावकर, कमलेश वराडकर, नितीन कोळंबकर, सुशील डिचोलकर, मिलिंद वेतुरेकर, गौरी टेमकर, कविता देऊलकर, प्राजक्ता पाटकर, मनीषा गोलतकर, लीनता आचरेकर, रुपाली चव्हाण, रुपाली आंबेरकर, रेश्मा चव्हाण, विजया मसुरकर आदी माजी विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभूदास आजगावकर यांनी केले.
