मन की बाद कार्यक्रमाचा पालकमंत्री चव्हाण यांनी घेतला घरातून लाभ

नागरिकांसाठीही केली सुविधा उपलब्ध

⚡सावंतवाडी ता.२६-: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज मन की बात कार्यक्रम झाला. हा कार्यक्रम देशभर आवर्जून एकला जातो. भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते यासाठी खास नियोजन करून नागरिकांसाठी सुविधा उपलब्ध करतात. जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण आज जिल्हा दौऱ्यावर होते. त्यांनी पंतप्रधान मोदी यांचा मन की बात हा लोकप्रिय कार्यक्रम केसरी येथील आपल्या निवासस्थानी पाहिला.

यावेळी त्यांच्या सोबत माजी नगराध्यक्ष तथा भाजप जिल्हा प्रवक्ते संजू परब, युवा मोर्चा चिटणीस बंटी पुरोहित यांच्यासह शेकडो भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.

You cannot copy content of this page