*भजब राष्ट्रीय सचिव विनोद तावडे यांचे मत्स्य महोत्सवात प्रतिपादन
*💫सावंतवाडी दि.१२-:* सिंधू आत्मनिर्भर योजनेअंतर्गत राबवण्यात येणाऱ्या योजनांना केंद्राकडून अनुदान देण्याची जबाबदारी आपली राहील असे प्रतिपादन भाजप राष्ट्रीय सचिव विनोद तावडे यांनी केले आहे. भारत सरकारच्या आत्मनिर्भर योजनेसाठी महाराष्ट्र सरकारने काम करणे गरजेचे होते. परंतु महाराष्ट्र सरकार राज्यपालांना प्रवासासाठी विमान न देण्याचे काम करत आहे. आत्मनिर्भर योजनेमुळे येथील युवकांना बाहेर जाऊन काम करण्याची गरज भासणार नसून, या योजनेमुळे त्यांना इथेच रोजगार उपलब्ध होणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
