केंद्रीय पर्यटन मंत्री श्रीपाद नाईक :आंबोली ग्रामपंचायतीच्या ई सेवा केंद्राचे उद्घाटन; सिंधुदुर्गात दोडामार्ग मध्ये रिसर्च सेंटरसाठी दोनशे कोटींचा निधी
आंबोली, ता.२१-:* येथील पर्यटन विकासासाठी राज्य शासन बरोबर मीटिंग लावून विकासासाठी नीच्छित सहकार्य करू.गोव्यासाठी आंबोली हे महाबळेश्वर आहे.आयुर्वेद ऑल इंडिया इन्स्टिट्यूट गोव्यात आणली आहे व रिसर्च सेंटर सिंधुदुर्गात दोडामार्ग मध्ये आणून २०० कोटी त्यासाठी निधी दिला आहे.त्यासाठी आंबोलीला आयुर्वेदिक वनस्पती माध्यमातून या पुढच्या काळात महत्व येणार आहे.आंबोली देशातील सुंदर पर्यटन स्थळ बनवण्यासाठी सहकार्य करू असे प्रतिपादन केंद्रीय जहाज बांधणी व बंदरे व पर्यटन मंत्री श्रीपाद नाईक यांनी आंबोली येथे केले.
आंबोली ग्रामपंचायतीच्या ई सेवा केंद्राचे उद्घाटन कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते झाले.यावेळी आमदार दीपक केसरकर,राजन तेली,प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर,गटविकास अधिकारी रवींद्र कणसे,पंचायत समिती उपसभापती शीतल राऊळ,सदस्य मोहन चव्हाण,विस्तार अधिकारी सुजित येरवळकर,सरपंच गजानन पालेकर,उपसरपंच दत्तू नार्वेकर,सदस्य काशिराम राऊत,महेश पावसकर,शंकर चव्हाण,सावित्री पालेकर,साक्षी गावडे,सारिका गावडे, स्वप्नीता कर्पे, छाया नार्वेकर,ग्रामविकास अधिकारी रतीलाल बहिरम, रामा गावडे,प्रकाश गावडे,के.पी.सिंह,सर्कल श्री.गुरव,आरोग्य अधिकारी महेश जाधव,पशुसंवर्धन अधिकारी रामचंद्र तेली, चौकूळ सरपंच सुरेश शेटये,उपसरपंच संजना गावडे, माजी जी.प.सदस्य सुषमा गावडे,गुलाबराव गावडे,माजी सभापती रवींद्र मडगावकर, वनक्षेत्रपाल विद्या कोडगे,केंद्र प्रमुख रामा गावडे,तलाठी घाडीगावकर,ग्रामस्थ आदी उपस्थित होते.यावेळी जिल्हा स्तरीय वकृत्व स्पर्धेत प्रथम आलेल्या मैथिली अनंत घोगळे या सहावीतील विद्यार्थिनीचा सत्कार मंत्री नाईक यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी आमदार दीपक केसरकर यांनी मेनन कंपनी येथे १५० एकर जागेत गोल्फ प्रकल्प,५० एकर मध्ये मनोरंजन प्रकल्प,गार्डन अशा योजना लवकरच राबवणार असल्याचे सांगितले. रत्नसिंधू योजनेतून सर्व पर्यटन स्थळ रस्ते,धबधबे यांचे सूनियोजन करण्यात येणार आहे.आंबोली चौकुळ गेळा गावाचा पर्यटन विकास करण्यात येणार आहे.कावळे साद येथे अतिक्रमण करू नये.पर्यटनाच्या दृष्टीने त्यांना गाळे बांधून देण्यात येतील.यावेळी माजी आमदार राजन तेली यांनी आंबोली पर्यटनाच्या दृष्टीने मंत्री श्रीपाद नाईक यांच्याकडे येथील विकासाच्या दृष्टीने मागण्या मांडल्या.गोड बोलण्यावर विश्वास ठेवू नये.कबुलयातदर प्रश्न हा निवडणूक आली ही येतो आणि कायमस्वरूपी जिवंत ठेवला जातो प्रश्न सुटायला आला त्यावेळी माशी शिंकली.हिमालय नंतर सह्याद्री पट्ट्यातील दुर्मिळ वनस्पती यांना महत्व येवून येथील विकास व्हावा”.यावेळी सरपंच गजानन पालेकर यांनीही मनोगत वेक्तं केले.तसेच विकासाच्या दृष्टीने मागणी केली.
